शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

हिंदूत्ववाद्यांच्या विरोधामुळे जीवंतपणीच 'लेखका'चा मृत्यू

By admin | Updated: January 14, 2015 13:23 IST

हिंदूत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे तामिळनाडूमधील ख्यातनाम लेखक पेरुमल मुरुगन यांच्यावर लिखाण बंद करण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. '

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. १४ - हिंदूत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे तामिळनाडूमधील ख्यातनाम लेखक पेरुमल मुरुगन यांच्यावर लिखाण बंद करण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. 'पेरुमल मुरुगन हा लेखक मृत पावला असून या पुढे मी प्राध्यापक पी. मुरुगन म्हणून राहीन, ज्या वाचकांकडे माझी पुस्तक असतील त्यांनी ती जाळून टाकावीत' असे भावनिक विधान त्यांनी फेसबुकवर केले आहे. 
तामिळनाडूमधील लेखक पेरुमल मुरुगन यांच्या मधोरुभागन या पुस्तकावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. या कादंबरीवर तामिळनाडूमधील हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या पुस्तकामुळे हिंदू धर्मीय आणि विशेषत: महिला भक्तांचा अपमान झाल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता. या कादंबरीवर बंदी टाकावी आणि लेखक मुरुगन यांना अटक करावी अशी मागणी हिंदूत्ववादी संघटना करत आहेत. या कादंबरीवरुन हिंदूत्ववादी नेत्यांनी पेरुमल यांच्यावर जहरी भाषेत टीकाही केली होती. अखेरीस दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदूत्ववादी संघटनांचे नेते आणि पेरुमल यांच्यात चार तास बैठक झाली. या बैठकीत पेरुमल यांनी पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळण्यास आणि बिनशर्त माफी मागण्याची तयारी दर्शवली होती. या घडामोडींनंतर हताश झालेल्या मुरुगन यांनी लिखाण कायमचेच बंद करण्याची घोषणा फेसबुकवरील पेजद्वारे केली आहे. 'माझ्यातील लेखकाचा मृत्यू झाला आहे. तो देवही नाही आणि माझा पुनर्जन्माच्या गोष्टींमध्ये विश्वासही नाही.  यापुढे माझी ओळख लेखक म्हणून राहणार नसून मी एक सामान्य शिक्षक आहे' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.  प्रकाशकांनी माझ्या अप्रकाशित कादंब-या व कथासंग्रह छापू नये, त्यांचे नुकसान भरुन देण्याचा मी प्रयत्न करीन, वाचकांनीही माझी पुस्तकं जाळून टाकावी असे त्यांनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनेच्या दबावापोटी लेखकाने कायमचे लिखाण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. 
 
नेमका वाद काय आहे ? 
पेरुमल मुरुगन हे प्राध्यापक असून तामिळनाडूमधील एका कॉलेजच्या आर्ट्स विभागात ते काम करतात. मुरुगन यांच्या आत्तापर्यंत नऊ कादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. मुरुगन यांच्या मधोरुभागन या कादंबरीमध्ये १०० वर्षांपूर्वीची तामिळनाडूतील एका महिलेची कथा मांडण्यात आली आहे. गावातील एका मंदिराच्या जत्रेत गर्भधारणेसाठी विवाहीत महिला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवू शकतात. ही महिला आपल्या पतीच्या इच्छेविरोधात या जत्रेत सामील होते अशा स्वरुपाचे कथानक या पुस्तकात मांडण्यात आले आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी यावरच आक्षेप घेतला आहे.