शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 11:31 IST

मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह यांनी एका वर्षात 38 वाघांचा मृत्यू होणे चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) वनमंत्री कुंवर विजय शाह (Forest Minister Vijay Shah) यांचे एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. राज्यात एका वर्षात 38 वाघांचा(Tiger) मृत्यू होणे ही गंभीर बाब नसून 40 ते 45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे, असे वक्तव्य शाह यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघांच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री शाह म्हणत आहेत की, जिथे जास्त लोकसंख्या असते, तिथे जास्त मृत्यू होतील. तुम्हाला माझे उत्तर विचित्र वाटेल. पण, साधारणत: 11-12  वर्षात वाघ मरतात, आमच्या मते राज्यात साडेसहाशे वाघ आहेत, तर भारत सरकारच्या नोंदीमध्ये 526 वाघ आहेत.

38 वाघांचा मृत्यू चिंतेचा विषय नाही

त्यांनी पुढे प्रश्न केला की, रेकॉर्डनुसार 526 वाघ आहेत आणि 11-12 वर्षात मध्ये वाघांचा मृत्यू झाला तर दरवर्षी किती वाघांचा मृत्यू झाला पाहिजे ? माझ्या मते दरवर्षी 40-45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे. जर 38 वाघांचा मृत्यू झाला असेल, तर हा आकडा आपल्यासाठी चिंतेचा विषय नाही. 

स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर आकडेवारी जाहीर

वाघांच्या मृत्यूबाबत एका एनजीओने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात वनविभागाने वाघांच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती, त्यात राज्यातील वाघांच्या गणनेची आकडेवारीही मांडण्यात आली आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

काँग्रेसने उडवली खिल्लीकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी वनमंत्र्यांच्या या विधानावर खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'वनमंत्री कुंवर विजय शाह वाघाचे वय 10-12 वर्षे सांगत आहेत. पण, शिवराज 18 वर्षानंतरही म्हणतात, टायगर अभी जिंदा है...' 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघforestजंगल