शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 11:31 IST

मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह यांनी एका वर्षात 38 वाघांचा मृत्यू होणे चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) वनमंत्री कुंवर विजय शाह (Forest Minister Vijay Shah) यांचे एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. राज्यात एका वर्षात 38 वाघांचा(Tiger) मृत्यू होणे ही गंभीर बाब नसून 40 ते 45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे, असे वक्तव्य शाह यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघांच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री शाह म्हणत आहेत की, जिथे जास्त लोकसंख्या असते, तिथे जास्त मृत्यू होतील. तुम्हाला माझे उत्तर विचित्र वाटेल. पण, साधारणत: 11-12  वर्षात वाघ मरतात, आमच्या मते राज्यात साडेसहाशे वाघ आहेत, तर भारत सरकारच्या नोंदीमध्ये 526 वाघ आहेत.

38 वाघांचा मृत्यू चिंतेचा विषय नाही

त्यांनी पुढे प्रश्न केला की, रेकॉर्डनुसार 526 वाघ आहेत आणि 11-12 वर्षात मध्ये वाघांचा मृत्यू झाला तर दरवर्षी किती वाघांचा मृत्यू झाला पाहिजे ? माझ्या मते दरवर्षी 40-45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे. जर 38 वाघांचा मृत्यू झाला असेल, तर हा आकडा आपल्यासाठी चिंतेचा विषय नाही. 

स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर आकडेवारी जाहीर

वाघांच्या मृत्यूबाबत एका एनजीओने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात वनविभागाने वाघांच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती, त्यात राज्यातील वाघांच्या गणनेची आकडेवारीही मांडण्यात आली आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

काँग्रेसने उडवली खिल्लीकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी वनमंत्र्यांच्या या विधानावर खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'वनमंत्री कुंवर विजय शाह वाघाचे वय 10-12 वर्षे सांगत आहेत. पण, शिवराज 18 वर्षानंतरही म्हणतात, टायगर अभी जिंदा है...' 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघforestजंगल