शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 11:31 IST

मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह यांनी एका वर्षात 38 वाघांचा मृत्यू होणे चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) वनमंत्री कुंवर विजय शाह (Forest Minister Vijay Shah) यांचे एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. राज्यात एका वर्षात 38 वाघांचा(Tiger) मृत्यू होणे ही गंभीर बाब नसून 40 ते 45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे, असे वक्तव्य शाह यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघांच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री शाह म्हणत आहेत की, जिथे जास्त लोकसंख्या असते, तिथे जास्त मृत्यू होतील. तुम्हाला माझे उत्तर विचित्र वाटेल. पण, साधारणत: 11-12  वर्षात वाघ मरतात, आमच्या मते राज्यात साडेसहाशे वाघ आहेत, तर भारत सरकारच्या नोंदीमध्ये 526 वाघ आहेत.

38 वाघांचा मृत्यू चिंतेचा विषय नाही

त्यांनी पुढे प्रश्न केला की, रेकॉर्डनुसार 526 वाघ आहेत आणि 11-12 वर्षात मध्ये वाघांचा मृत्यू झाला तर दरवर्षी किती वाघांचा मृत्यू झाला पाहिजे ? माझ्या मते दरवर्षी 40-45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे. जर 38 वाघांचा मृत्यू झाला असेल, तर हा आकडा आपल्यासाठी चिंतेचा विषय नाही. 

स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर आकडेवारी जाहीर

वाघांच्या मृत्यूबाबत एका एनजीओने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात वनविभागाने वाघांच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती, त्यात राज्यातील वाघांच्या गणनेची आकडेवारीही मांडण्यात आली आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

काँग्रेसने उडवली खिल्लीकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी वनमंत्र्यांच्या या विधानावर खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'वनमंत्री कुंवर विजय शाह वाघाचे वय 10-12 वर्षे सांगत आहेत. पण, शिवराज 18 वर्षानंतरही म्हणतात, टायगर अभी जिंदा है...' 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघforestजंगल