शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धक्कादायक! हनीमून ठरला जीवघेणा, फोटोशूट करताना कपलचा मृत्यू; 1 जूनला झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 10:07 IST

हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे.

बालीमध्य़े हनीमूनला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत एक भयंकर घटना घडली आहे. त्यांचा हनीमून जीवघेणा ठरला आहे. चेन्नईतील कपल फोटोशूटसाठी वॉटरबाईकवरून जात असताना बुडालं. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 1 जून रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला होता आणि त्यानंतरच ही दु:खद घटना घडली आहे.  पती लोकेश्वरनचा मृतदेह शुक्रवारी तर पत्नी विबुश्नियाचा मृतदेह शनिवारी सापडला.

रिपोर्ट्सनुसार, कपल हनीमून दरम्यान फोटोशूटसाठी बीचवर पोहोचलं होतं. त्यानंतर वॉटरबाईक चालवण्याचा विचार केला आणि तोल गेल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती देताना बालीचे अधिकारी सांगतात की, केवळ प्राथमिक तपास झाला आहे. त्यानुसार या जोडप्याला वॉटरबाईकवर फोटोशूट करायचे होते, त्याच दरम्यान त्यांना तोल राखता आला नाही आणि दोघेही समुद्रात बुडाले. 

दोघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, दोघांच्या कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांचे मृतदेह लवकर भारतात आणता येतील. इकडे पालकांची अवस्था वाईट झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर ही घटना घडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.