शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी', ममतांच्या भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामींकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:52 IST

Subramanian Swamy : या अपयशाला जबाबदार कोण, असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आज सकाळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्द्यांवर अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या अपयशाला जबाबदार कोण, असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, बैठकीनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांचे जोरदार कौतुक केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी ज्या राजकारण्यांना भेटलो किंवा त्यांच्यासोबत काम केले. यामध्ये ममता बॅनर्जी या मोरारजी देसाई, जेपी, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या रँकमधील आहेत. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नाही. भारतीय राजकारणातील हा दुर्मीळ गुण आहे. 

याचबरोबर, ज्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी तुम्ही  तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की मी आधीच त्यांच्यासोबत आहे. मला पक्षात येण्याची गरज नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर ते उघडपणे निशाणा साधत आहेत. तसेच,  एनडीए सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोणतीही मोठी भूमिका न मिळाल्याने नाराज असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काही काळ सरकारच्या निर्णयांवर उघडपणे टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

'ममता बॅनर्जी खऱ्या हिंदू'गेल्या वर्षीही बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त म्हटले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी