शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

'मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी', ममतांच्या भेटीनंतर सुब्रमण्यम स्वामींकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 10:52 IST

Subramanian Swamy : या अपयशाला जबाबदार कोण, असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आज सकाळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्द्यांवर अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या अपयशाला जबाबदार कोण, असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

बुधवारी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, बैठकीनंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांचे जोरदार कौतुक केले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मी ज्या राजकारण्यांना भेटलो किंवा त्यांच्यासोबत काम केले. यामध्ये ममता बॅनर्जी या मोरारजी देसाई, जेपी, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या रँकमधील आहेत. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नाही. भारतीय राजकारणातील हा दुर्मीळ गुण आहे. 

याचबरोबर, ज्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी तुम्ही  तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की मी आधीच त्यांच्यासोबत आहे. मला पक्षात येण्याची गरज नाही. सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर ते उघडपणे निशाणा साधत आहेत. तसेच,  एनडीए सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोणतीही मोठी भूमिका न मिळाल्याने नाराज असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काही काळ सरकारच्या निर्णयांवर उघडपणे टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.

'ममता बॅनर्जी खऱ्या हिंदू'गेल्या वर्षीही बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त म्हटले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी