शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यूपीत रामायण पठणाच्या कार्यक्रमात दलितांना मंदिरात प्रवेश नाही;मंदिर पुजाऱ्याने काढली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 09:44 IST

उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठ दरम्यान दलितांना त्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचं सांगण्यात आलं आहे

कानपूर, दि. 23- उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठ दरम्यान दलितांना त्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचं सांगण्यात आलं आहे. या गावातील मंदिराच्या बाहेर तशी नोटीसही लावण्यात आली आहे. रामायण पठणाच्या काळात दलित व्यक्तीला मंदिर प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली असून तशी नोटीसच लावण्यात आली आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या या धक्कादायक नोटीसीमुळे तेथिल दलित लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दलित नकारात्मक भावना घेऊन येतात असा समज असल्याने गावात कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं जातं, असं या गावातील दलितांनी सांगितलं आहे. गावातील जानकी मंदिरच्या पुजाऱ्यानेच आम्हाला रामायण पाठच्या काळात दहा दिवस घरातून बाहेर न पडण्याचे फर्मान बजावलं असल्याचं या गावकऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.

आम्ही सोमवारी राम जानकी मंदिरात रामायण पठणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. पण मंदिरात प्रवेश करताना आम्हाला प्रवेशद्वारावर लावलेली नोटीस वाचायला लावली. त्यामध्ये रामायण पठणाच्या दहा दिवसात दलितांनी मंदिरात येऊ नये, असं म्हंटलं होतं. पूजाऱ्याने लावलेली ती नोटीस पाहून आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया गावातील एका महिलेने दिली आहे. गावातील या महिलेने पुजाऱ्याच्या या निर्णयाची निंदा केली आहे. या गावात दलित लोकसंख्या जास्त आहे. पण या पुजाऱ्याने आम्हाला रामायण पठणासाठी बंदी घातली आहे. आम्ही जेव्हा या विषयी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला धकावल्याचंही या महिलेने सांगितलं आहे. 

दलितांना मंदिर प्रवेशास मनाई करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही, असं स्थानिक रहिवाशी गुरू प्रसाद आर्य यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून त्यात पुजाऱ्याचा हात असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उपविभागीय दंडाधिकारी सुरेश कुमार यांनी दिली आहे.