शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यूपीत रामायण पठणाच्या कार्यक्रमात दलितांना मंदिरात प्रवेश नाही;मंदिर पुजाऱ्याने काढली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 09:44 IST

उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठ दरम्यान दलितांना त्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचं सांगण्यात आलं आहे

कानपूर, दि. 23- उत्तर प्रदेशातील एका गावात रामायण पठवावरून वाद झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठ दरम्यान दलितांना त्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचं सांगण्यात आलं आहे. या गावातील मंदिराच्या बाहेर तशी नोटीसही लावण्यात आली आहे. रामायण पठणाच्या काळात दलित व्यक्तीला मंदिर प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली असून तशी नोटीसच लावण्यात आली आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या या धक्कादायक नोटीसीमुळे तेथिल दलित लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दलित नकारात्मक भावना घेऊन येतात असा समज असल्याने गावात कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं जातं, असं या गावातील दलितांनी सांगितलं आहे. गावातील जानकी मंदिरच्या पुजाऱ्यानेच आम्हाला रामायण पाठच्या काळात दहा दिवस घरातून बाहेर न पडण्याचे फर्मान बजावलं असल्याचं या गावकऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.

आम्ही सोमवारी राम जानकी मंदिरात रामायण पठणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. पण मंदिरात प्रवेश करताना आम्हाला प्रवेशद्वारावर लावलेली नोटीस वाचायला लावली. त्यामध्ये रामायण पठणाच्या दहा दिवसात दलितांनी मंदिरात येऊ नये, असं म्हंटलं होतं. पूजाऱ्याने लावलेली ती नोटीस पाहून आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया गावातील एका महिलेने दिली आहे. गावातील या महिलेने पुजाऱ्याच्या या निर्णयाची निंदा केली आहे. या गावात दलित लोकसंख्या जास्त आहे. पण या पुजाऱ्याने आम्हाला रामायण पठणासाठी बंदी घातली आहे. आम्ही जेव्हा या विषयी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला धकावल्याचंही या महिलेने सांगितलं आहे. 

दलितांना मंदिर प्रवेशास मनाई करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही, असं स्थानिक रहिवाशी गुरू प्रसाद आर्य यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून त्यात पुजाऱ्याचा हात असेल तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उपविभागीय दंडाधिकारी सुरेश कुमार यांनी दिली आहे.