शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

दाल लेकवर ‘माणुसकी’चे तरंग!

By admin | Updated: August 27, 2016 06:06 IST

धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे

श्रीनगर : धगधगत्या जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल ४८ दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे; पण श्रीनगरमधील हा भाजीबाजार या संचारबंदीला अपवाद आहे. येथे दाललेकमध्ये नित्यनेमाने बोटीतून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आपला दिनक्रम कायम सुरू ठेवला आहे. अर्थात त्यावर कुणाचा काही आक्षेपही नाही. कदाचित, श्रीनगरातील दाललेकवर टिकून असलेल्या माणुसकीचे हे तरंग असावेत. हिंसाचारामुळे जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड करावी लागत आहे; पण या परिस्थितीला अपवाद ठरले आहे तो येथील दाललेक. १०० वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण असलेले श्रीनगरमधील हा दाललेक या संचारबंदीच्या काळातही सकाळच्या वेळी तुम्हाला फुललेला दिसेल. तोच गजबजाट, तेच सौंदर्य, तीच धावपळ येथे बघायला मिळेल. सूर्योदयाच्या किरणांसोबत सकाळीच येथील सरोवर परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, तेव्हाच ५० हून अधिक भाज्यांच्या बोटी या दाललेकवर दाखल झालेल्या असतात. परिसरातील भाजी विक्रेत्यांचा हा दिनक्रम आहे. अवघ्या दोन तासांत भाज्या विकून अगदी ऊन्हे तापू लागण्यापूर्वीच हे भाजी विक्रेते भाजी विकून निघालेले असतात. या भाजी बाजारालाही एका शतकाची परंपरा आहे. येथील भाजी विक्रेते अब्दुल रेहमान म्हणतात की, हा बाजार संचारबंदीमुळे बंद नाही. परिसरातून नित्यनेमाने येथे भाजी विक्रेते येतात. दरम्यान, येथे सरोवरावर सकाळीच टोमॅटो, वांगे, कोबी आदी ताज्या भाज्या विक्रीसाठी येतात. (वृत्तसंस्था)>दररोज होते लाखो रुपयांची उलाढालया भाजी विक्रेत्यांचे ना दुकान आहे ना मालकीची जागा. सरोवरात भाजीची बोट घेऊन ते येतात आणि भाजी विक्री झाल्यानंतर निघून जातात. अशाच भाजी विक्रेत्यापैकी एक नजीर बट. ३५०० रुपयांची भाजी घेऊन तो येतो. त्याच्यासारख्या अनेकांचे उपजीविकेचे भाजी विक्री हे साधन आहे. थोडीथोडकी नाही, तर दररोज लाखांची उलाढाल या भाजी बाजारात होते. भाज्यांच्या ठोक विक्रीचाही हा बाजार आहे. 100वर्षांपासून असंख्य पर्यटकांचे आकर्षण असलेला दाललेक संचारबंदीतही सकाळच्या वेळी फुललेला दिसेल.>दाललेक येथे नादरू (कमल ककडी, कमळांची आतून स्वच्छ केलेली देठे, ज्याची उत्तर भारतात सर्रास भाजी बनवली जाते) विक्रीसाठी आलेल्या आशिक हुसेन यांनी सांगितले की, हे सर्व विक्रेते स्थानिक आहेत. विशेष म्हणजे या भाज्यांसाठी खतांचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे या भाज्यांची गोडी अधिक असल्याचे ते सांगतात.