शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खिचडीत डाळ, पुलावमध्ये भाज्याच; तांदूळ निर्यातबंदीनंतर भाव उच्चांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 08:02 IST

भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. 

नवी दिल्ली : भारताने तांदळाच्या निर्यात बंदी केल्यानंतर ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात तांदळाच्या किमती १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) शुक्रवारी दिली. संघटनेने अहवालात म्हटले आहे की, जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये तांदळाच्या किमती ९.८ टक्के वाढल्या. भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. भारताने जुलैमध्ये बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तांदूळ निर्यात बंदी निर्णय जाहीर करताना ग्राहक व्यवहार व अन्न मंत्रालयाने म्हटले होते की, निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारात पुरेसा तांदूळ उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच दरवाढीलाही लगाम लागेल.

बंदीमुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत

अहवालात म्हटले आहे की, भारताच्या तांदूळ निर्यात बंदीच्या कालावधीबाबतची अनिश्चितता आणि बंधनांमुळे निर्माण झालेल्या चिंता यामुळे पुरवठा साखळीतील व्यावसायिकांनी साठे रोखून धरले आहेत. काही जण कराराबाबत फेरवाटाघाटी करीत आहेत, तर काहींनी किंमत प्रस्ताव देणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारातील तांदळाची उपलब्धता घटली आहे. तांदूळ हा जगातील प्रमुख आहार असून त्याच्या किमती अनेक घटकांच्या पार्श्वभूमीवर वाढल्या आहेत. 

अन्न किंमत निर्देशांक मात्र २ वर्षांत नीचांकी पॅरिस : तांदळाच्या किमती घटल्या तरीही ऑगस्टमध्ये एफएओचा जागतिक अन्न निर्देशांक घसरून दोन वर्षांच्या नीचांकावर गेला. जगात सर्वाधिक व्यापार केल्या जाणाऱ्या खाद्यवस्तूंच्या किमतींवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्टमध्ये घसरून १२१.४ अंकांवर आला. 

टॅग्स :foodअन्नIndiaभारतMarketबाजार