शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Cyrus Mistry: पारशी होते सायरस मिस्त्री मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने का झाले अंत्यसंस्कार, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 15:55 IST

Cyrus Mistry: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं

मुंबई -  टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आज मंगळवारी मुंबईमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्य मुंबईतील वरळी येथे इलेक्ट्रिक शवदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री हे पारशी होते. मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.

पारसी धर्मामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत इतर पद्धतींपेक्षा वेगळी आहे. पारशी धर्मामध्ये हिंदूंप्रमाणे दहन किंवा मुस्लिम, ख्रिश्चनांप्रमाणे मृतदेह दफन केला जात नाही. तर पारशी समुदाय हा मृत्यूनंतर मृतदेहाला टॉवर ऑफ सायलेन्सवर ठेवतात. तिथे गिधाडं येऊन तो मृतदेह खातात. गिधाडांनी मृतदेह खाणं हा पारशी रीतीरिवाजाचा भाग आहे.

सायरस मिस्त्री यांच्यावर पारशी रीतीरिवाजांऐवजी हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार का झाले, यामागे एक एक कारण आहे. ते कारण म्हणजे कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील रीतीरिवाज, राहण्याच्या पद्धती, लग्नापासून अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्या पद्धती बदलाव्या लागल्या आहेत. कोरोनाच्या साथीचा परिणाम या समुहाच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवरही पडला.

केंद्र सरकारने कोरोनाच्या साथीदरम्यान एक एसओपी जारी करून पारसी समाजाच्या अंत्यसंस्काराच्या रीतीरिवाजांवर बंदी आणली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही या एसओपीविरुद्ध आदेश देण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई