शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Cyrus Mistry: पारशी होते सायरस मिस्त्री मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने का झाले अंत्यसंस्कार, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 15:55 IST

Cyrus Mistry: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं

मुंबई -  टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आज मंगळवारी मुंबईमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्य मुंबईतील वरळी येथे इलेक्ट्रिक शवदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री हे पारशी होते. मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.

पारसी धर्मामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत इतर पद्धतींपेक्षा वेगळी आहे. पारशी धर्मामध्ये हिंदूंप्रमाणे दहन किंवा मुस्लिम, ख्रिश्चनांप्रमाणे मृतदेह दफन केला जात नाही. तर पारशी समुदाय हा मृत्यूनंतर मृतदेहाला टॉवर ऑफ सायलेन्सवर ठेवतात. तिथे गिधाडं येऊन तो मृतदेह खातात. गिधाडांनी मृतदेह खाणं हा पारशी रीतीरिवाजाचा भाग आहे.

सायरस मिस्त्री यांच्यावर पारशी रीतीरिवाजांऐवजी हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार का झाले, यामागे एक एक कारण आहे. ते कारण म्हणजे कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील रीतीरिवाज, राहण्याच्या पद्धती, लग्नापासून अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्या पद्धती बदलाव्या लागल्या आहेत. कोरोनाच्या साथीचा परिणाम या समुहाच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवरही पडला.

केंद्र सरकारने कोरोनाच्या साथीदरम्यान एक एसओपी जारी करून पारसी समाजाच्या अंत्यसंस्काराच्या रीतीरिवाजांवर बंदी आणली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही या एसओपीविरुद्ध आदेश देण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई