शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Bulbul : पश्चिम बंगालमध्ये 'बुलबुल' चक्रीवादळाने तब्बल 19,000 कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:36 IST

Cyclone Bulbul : 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे.

ठळक मुद्दे'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोलकाता - 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टी भागातील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बुलबुल या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला आहे. तसेच जनजीवन विस्कळात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चक्रीवादळचा फटका बसलेल्या भागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार विविध भागांचे रिपोर्ट तयार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे 15,000 कोटी ते 19,000 कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सिंचन, वन, वीज, सार्वजनिक आरोग्य, इंजिनिअरिंगल आणि पंचायतीसह विविध विभागांना याबाबतचा रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागातील रस्ते आणि वीज पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने रस्त्यांवरील झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने हाती घेतले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी 2473 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 26 हजार घरांची पडझड झाली आहे. राज्यात 9 ठिकाणी लाखो लोकांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले असून काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Cyclone Bulbulबुलबुल चक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाDeathमृत्यू