शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Cyclone Bulbul : पश्चिम बंगालमध्ये 'बुलबुल' चक्रीवादळाने तब्बल 19,000 कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:36 IST

Cyclone Bulbul : 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे.

ठळक मुद्दे'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोलकाता - 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टी भागातील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बुलबुल या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला आहे. तसेच जनजीवन विस्कळात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चक्रीवादळचा फटका बसलेल्या भागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार विविध भागांचे रिपोर्ट तयार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे 15,000 कोटी ते 19,000 कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सिंचन, वन, वीज, सार्वजनिक आरोग्य, इंजिनिअरिंगल आणि पंचायतीसह विविध विभागांना याबाबतचा रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागातील रस्ते आणि वीज पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने रस्त्यांवरील झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने हाती घेतले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी 2473 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 26 हजार घरांची पडझड झाली आहे. राज्यात 9 ठिकाणी लाखो लोकांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले असून काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Cyclone Bulbulबुलबुल चक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाDeathमृत्यू