शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Cyclone Bulbul : पश्चिम बंगालमध्ये 'बुलबुल' चक्रीवादळाने तब्बल 19,000 कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:36 IST

Cyclone Bulbul : 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे.

ठळक मुद्दे'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोलकाता - 'बुलबुल' चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा बसला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. किनारपट्टी भागातील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. बुलबुल या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 19,000 कोटींचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला आहे. तसेच जनजीवन विस्कळात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चक्रीवादळचा फटका बसलेल्या भागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार विविध भागांचे रिपोर्ट तयार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे 15,000 कोटी ते 19,000 कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सिंचन, वन, वीज, सार्वजनिक आरोग्य, इंजिनिअरिंगल आणि पंचायतीसह विविध विभागांना याबाबतचा रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागातील रस्ते आणि वीज पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने रस्त्यांवरील झाडे हटविण्यास सुरुवात केली आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने हाती घेतले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री जावेद खान यांनी 2473 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 26 हजार घरांची पडझड झाली आहे. राज्यात 9 ठिकाणी लाखो लोकांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले असून काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

टॅग्स :Cyclone Bulbulबुलबुल चक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाDeathमृत्यू