शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:46 IST

जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जानेवारी २०२६ पासून तो संपूर्ण राज्यात राबवला जाईल असं सरकारने सांगितले

दारू विक्री आणि पॅकेजिंगबाबत केरळ सरकार नवी योजना सुरू करत आहे. त्यात एका बाटलीवर २० रूपये अतिरिक्त द्यावे लागतील. परंतु रिकामी बाटली परत केल्यानंतर २० रुपये परत केले जातील. पर्यावरणाची काळजी घेत सरकारने प्लास्टिक कचऱ्यापासून होणारं नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. 

उत्पादन शुल्क विभागाने प्लास्टिकपासून होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी २ निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयात केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशन (बेव्हको) च्या आउटलेटमध्ये विकली जाणारी प्रीमियम दारू आता प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध होणार नाही. राज्यात ८०० रुपयांहून अधिक दारूची बाटली काचेच्या बाटलीत विक्री केली जाईल. त्याशिवाय दुसऱ्या निर्णयात दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून २० रूपये अतिरिक्त घेतले जातील. ही रक्कम बाटली परत केल्यानंतर ग्राहकाला परत मिळतील. प्रत्येक बाटलीवर क्यूआर कोड लावला जाईल, ज्यामुळे रिफंड प्रक्रिया ट्रॅक करण्यास मदत होईल. परंतु रिफंड केवळ तिथूनच मिळेल जिथून बाटली खरेदी केली असेल असं सरकारने स्पष्ट केले आहे.

२ जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट लागू होणार

मंत्री एम.बी. राजेश यांनी सांगितले की, ग्राहकांकडून २० रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही तर ही रक्कम केवळ जमा असेल. ही योजना लागू करण्यासाठी केरळ सरकारने क्लीन केरळ कंपनीसोबत भागीदारी केली आहे. सप्टेंबर २०२५ पासून तिरुवनंतपुरम आणि कन्नूर जिल्ह्यात हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जानेवारी २०२६ पासून तो संपूर्ण राज्यात राबवला जाईल असं सरकारने सांगितले. तामिळनाडूत अशीच एक योजना यशस्वीरित्या सुरू झाली ज्याचा अभ्यास केरळ सरकारने केला. तामिळनाडूत बाटली रिफंड करण्याची प्रक्रिया पाहून हा मॉडेल केरळ सरकारने त्यांच्या राज्यात आणला आहे.

दरवर्षी ७०  कोटींची होते दारूविक्री

माहितीनुसार, केरळमध्ये दरवर्षी बेव्हको आऊटलेटमधून जवळपास ७० कोटींची दारू बाटली विक्री होते. ज्यात ८० टक्के बाटल्या प्लास्टिकच्या असतात. या बाटल्या रस्त्यांवर, नदीत आणि सार्वजनिक ठिकाणी फेकल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. केरळ सरकारची ही योजना रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करेल. प्लास्टिक कचरा कमी करणे, प्लास्टिकचे रिसाइक्लिंग करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे मंत्री राजेश यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Keralaकेरळenvironmentपर्यावरणPlastic banप्लॅस्टिक बंदी