शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

चलन तुटवडा काही आठवड्यांतच संपेल

By admin | Updated: January 21, 2017 06:08 IST

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने लोकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने लोकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले, सामान्य माणसाला त्रास झाला, विवाह पार पडण्यात अडथळे आले आणि काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, हे मान्य करतानाच, येत्या काही आठवड्यांत हा प्रश्न सोडविला जाईल, लोकांच्या हातात पुरेशा नोटा आलेल्या असतील, अशी खात्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केली. सार्वजनिक लेखा समितीच्या (पीएसी) बैठकीत पटेल यांना बोलावण्यात आले होते. समिती सदस्यांच्या नोटाबंदीसंबंधातील प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. परिस्थितीला तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आवश्यक ती पावले उचलली होती. डिजिटल पेमेंट्सवरील शुल्क आकारणी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी म्हणून रिझर्व्ह बँक बँका आणि ती सेवा देणाऱ्यांशी चर्चा करीत आहे. शहरी भागांत आता चलनतुटवडा भासत नसला तरी ग्रामीण भागांत तो काही प्रमाणात जाणवत असल्याचे उर्जित पटेल यांनी मान्य केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागांत अधिकाधिक चलन पोहोचावे, याची व्यवस्था करण्यात येत असून, दोन आठवड्यात तिथेही पुरेशा प्रमाणात चलन पोहोचलेले असेल. नोटाबंदीमुळे काही काळ लोकांना खूप त्रास सहन करावा लागला असला तरी, भविष्यासाठी आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा फायदा होणार आहे.रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना थेट तोंड देण्याची ही गेल्या दोन दिवसांतील दुसरी वेळ होती. बुधवारी पटेल यांची संसदेच्या अर्थ समितीपुढेही साक्ष झाली होती.सर्व नोटांची मोजणी सुरू सदस्यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घेतला होता. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता त्याची घोषणा केली होती. ते म्हणाले, ५0 दिवसांत जमा झालेल्या तसेच बदलण्यात आलेल्या सर्व नोटांची मोजणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच ५00 व १000 रुपये किमतीच्या किती नोटा या काळात जमा झाल्या, त्यांचे एकूण मूल्य किती आहे, हे सांगता येईल. पटेल यांच्यासमवेत रिझर्व्ह बँकेचे दोन डेप्युटी गव्हर्नर तसेच काही वरिष्ठ अधिकारीही समितीपुढे उपस्थित होते.