शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूनंतर पुन्हा श्रीनगरमध्ये संचारबंदी

By admin | Updated: October 9, 2016 00:30 IST

पेलेट गनमुळे जखमी झालेल्या १२ वर्षी मुलाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

श्रीनगर : पेलेट गनमुळे जखमी झालेल्या १२ वर्षी मुलाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जुनैद आखून असे मृत मुलाचे नाव आहे. सौरा येथील एसकेआयएम हॉस्पिटलमध्ये काल रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याबरोबर काश्मिरातील हिंसाचारात मृत्यू पावलेल्यांची संख्या ८४ झाली आहे. सफकदल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैदापोरा येथे करण्यात आलेल्या एका हिंसक आंदोलनात जनैदला डोक्यात पेलेट लागली होती. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाच्या मृत्यूनंतर लगेच सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. ती आज कायम ठेवण्यात आली. संचारबंदी असलेल्या पोलिस ठाण्यांत नौहत्ता, खानयार, रैनावारी, सफकदाल, महाराज गंज, मैसुमा आणि बटमालू यांचा समावेश आहे. उर्वरित काश्मिरात जमावबंदी आदेश लागू आहे. सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी खातमा केला होता. त्यानंतर काश्मिरात हिंसाचार उसळला. सलग ९२ व्या दिवशी राज्यात तणाव आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ८४ लोक मारले गेले आहेत. त्यात २ जवानांचा समावेश आहे. याशिवाय हजारो लोक जखमी झाले आहेत. तरी तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, पेट्रोल पंप, शैक्षणिक संस्था बंद आहेत. रस्त्यावरील सार्वजनिक वाहनेही बंद आहेत. श्रीनगर शहरांतील रस्त्यांवर शनिवारी शुकशुकाट दिसून आला. अल्प प्रमाणात खाजगी वाहने धावताना दिसून आली. त्यांची सुरक्षा दलांकडून तपासणी करण्यात येत होती. (वृत्तसंस्था)जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्यात वाढ- पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांमध्ये जम्मूला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य आणून ठेवले असून, पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेकडील भागांत राहणाऱ्या रहिवाशांना तेथून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही रहिवाशांच्या स्थलांतराला पाकिस्तानचे लष्कर स्वत:च मदत करीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.आतापर्यंत जम्मूकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागांतही पाकिस्तानतर्फे शस्त्रसंधीचे अनेकदा उल्लंघन झाले आहे. तसेच तेथून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्या भागातही भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राइक्स होतील, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. तसे प्रत्यक्षात घडलेच, तर त्याला तोंड देता यावे, यासाठी सैन्याची अधिक कुमत तिथे तैनात करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांना स्ट्राइक्सचा त्रास होता कामा नये आणि त्यांच्यामार्फत कोणतीही गुप्त माहिती बाहेर जाता कामा नये, यासाठीच लोकांचे स्थलांतर केल्याचे सांगण्यात येत आहे.सीमेवरील हमीरपूरला शांततेची आस- पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारामुळे गाव सोडून आलेल्या सीमा भागातील हमीरपूर या गावातील नागरिकांना दोन्ही देशांत शांतता निर्माण होईल, अशी आशा वाटतेय. त्यांना आपल्या घराकडे परत जाण्याची आस लागून राहिली आहे. घरेदारे, उभी पिके आणि गुरेढोरे असे सगळे सोडून हे लोक गावातून परागंदा झाले आहेत. हमीरपूरमध्ये प्रवेश करताच नजरेस पडतात कुलूपबंद घरे आणि भयाण शांतता; पण अचानक फुटलेला तोफगोळा या भयाण शांततेच्या काळजावर अचानक घाव घालतो. गुराढोरांची काळजी घेण्यासाठी गावात मागे थांबलेला तारसेन लाल याची भेट झाली. - ४२ वर्षीय लाल म्हणाले की, बोलायच्या आधी या भिंतीच्या आडोशाला या. केव्हा तोफेचा एखादा गोळा येऊन आदळेल काही सांगता येत नाही. हमीरपूर हे गाव नियंत्रण रेषेपासून हाकेच्या अंतरावर आहे. भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर येथील लोक गाव सोडून जम्मूमध्ये स्थलांतरित झाले. प्रशासनाने उभारलेल्या निर्वासित छावणीत त्यांनी आश्रय घेतला आहे. छावणीतून दररोज दोन लोक गावात येऊन गुरांना चारा-पाणी करतात. अर्थात यात जिवाची जोखीम आहेच. लाल यांच्यासोबत कुलबीर सिंग (५४) नावाचे आणखी एक गृहस्थ गुरांच्या चारा-पाण्यासाठी आले आहेत. त्यांनी सांगितले की, लोकांना शांतता हवी आहे. त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. - मेहनतीने बांधलेल्या आपल्या घरापासून दूर राहायला कोणाला आवडते. दोन्ही देशांत जेव्हा केव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा आम्हाला घरे सोडून जावे लागते, हे आमचे दुर्दैवच आहे. सरकारने माणसांसाठी राहण्याची सोय केली; पण जनावरांच्या चारापाण्याची कोणतीही सोय केलेली नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून येथे आलो नाही, तर ही जनावरे चारा-पाण्यावाचून मरून जातील. मुलीचा विवाह कसा होणार?निर्वासितांच्या छावणीत ६४ वर्षीय शीला देवी यांनी सांगितले की, माझ्या मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. आम्ही लग्नाची तयारी करीत होतो. घराची रंगरंगोटी हाती घेतली होती; पण भारत-पाक तणावाने सारेच विस्कटले आहे. परिस्थिती न सुधारल्यास निर्वासितांच्या छावणीतच आम्हाला मुलीचे लग्न करावे लागेल. तसे झालेच तर आम्ही सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करू. कारण इथे आम्ही लग्नासाठी पैसे उभे नाही करू शकत.