शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

दिल्ली पोलिसांवर आरोप करू नका, अमित शाहांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 19:43 IST

'700 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे'

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले होते. याला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत पोलिसांनी दिल्लीतील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी योग्य कामगिरी केल्याचे सांगत दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.

"मी राजकीय व्यक्ती आहे. देशाचा गृहमंत्री आहे. माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. मात्र, दिल्ली पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. कारण, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण ताकदीने दंगलीवर नियंत्रण मिळविले आणि 13 टक्के लोकांना बाहेर जाऊ दिले नाही. ही पोलिसांची यशस्वी कामगिरी आहे. त्यामुळे पोलिसांवर आरोप करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करू नका", अशा शब्दांत अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

याचबरोबर, अमित शाह म्हणाले, "700 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. जलदगतीने कारवाई होत आहे. 2600 जणांना पुराव्याच्या आधारावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. काल 1170 जणांची ओळख पटली होती. आतापर्यंत 1170 जणांची ओळख पटली आहे. 24 फेब्रुवारीच्या रात्री उत्तर प्रदेशची सीमा बंद करण्यात आली होती". 

"दिल्ली हिंसाचाराआधी 22 फेब्रुवारीला काही सोशल मीडियावर अकाऊंट तयार करण्यात आले आणि 26 फेब्रुवारीला बंद करण्यात आले. हे करणारे लोक कोठेतरी बसले असतील आणि माझे म्हणणे ऐकत असतील. त्यांना वाटत असेल की आपण वाचू शकू. मात्र, मी स्पष्ट करू इच्छितो की त्यांना पाताळातून शोधून काढू", अशा शब्दांत अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारात हात असणाऱ्यांना राज्यसभेतून ठणकावले आहे. तसेच, दिल्ली हिंसाचार प्रकरणातील 1100 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये 336 लोक उत्तर प्रदेशातून आले होते. याचे पुरावे सुद्धा आहेत, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली