शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 14:35 IST

लोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लोकांसाठी सीआरपीएफकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ही हेल्पलाइन चालविली जाते. मात्र या नंबरचा पाकिस्तानच्या काही टवाळखोरांनी गैरवापर करत असल्याचं समोर येतंय. हेल्पलाइन नंबरवर ७ हजार ०७१ कॉल्स ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान आले. त्यातील १७१ कॉल्स भारताच्या बाहेरुन आले आहेत. 

लोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात. मात्र पाकिस्तानमधील काही लोक सुरक्षा यंत्रणांच्या जवानांसोबत अपशब्द व्यक्त करुन त्यांचा राग काढतात. मदतीसाठी देण्यात येणाऱ्या हेल्पलाइनवर २ हजार ७०० कॉल्स सुरक्षा दलाच्या जवानांचे परिवाराकडून तर २ हजार ४४८ कॉल्स काश्मीरच्या बाहेरील लोक त्यांच्या कुटुंबाच्या काळजीपोटी करतात. १ हजार ७५२ कॉल्स गैरकाश्मिरी लोक राज्यातील स्थिती जाणण्यासाठी करतात. 

टोल फ्री नंबर १४४११ वर सऊदी अरबवरुन ४५ कॉल्स आले तर जगातील २२ देशांमधून काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी कॉल्स आलेले आहे. यात ३९ यूएई, १२ कुवैत, ८ इस्त्राईल, मलेशिया ७, तसेच यूके, सिंगापूर आणि बांग्लादेश याठिकाणाहून कॉल्स आलेले आहेत. ३ फोन कॉल्स कॅनडा, बहरीन, जर्मनी, फिलीपींस आणि थायलँडमधूनही फोन कॉल्स आले. 

जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पाकिस्तानी नंबरवरुनही काही फोन कॉल्स येत आहेत. त्यातील काही कॉल्स त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी आले होते. तर बहुतांश कॉल्स आपला राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षा जवानांना अपशब्द देण्यासाठी आले होते. राज्यात तैनात असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसाठी हेल्पलाइन नंबर फायदेशीर ठरतोय. कारण त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या कॉल्समुळेही जवानांचे मनोबल उंचावत आहे.

५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम हटविण्यात आलं. मात्र भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान सैरभैर झालं. अनेक देशांकडे पाकिस्तानने मदतीची याचना केली मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून धर्माच्या नावाखाली धमकविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत