शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

नाशिकमधील तीन तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट, ५० टक्के पेक्षा कमी पर्जन्य

By संदीप भालेराव | Updated: August 21, 2023 14:49 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार इतके क्षेत्र प्रस्तावित असून आत्तापर्यंत ५ लाख ९१ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नाशिक : हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत नाशिक जिल्ह्यातील पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप शेतपिकांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन संकटात सापडले आहे; तर तीन तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. येत्या पंधरवड्यात दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार इतके क्षेत्र प्रस्तावित असून आत्तापर्यंत ५ लाख ९१ हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप पेरणीची टक्केवारी ९२ टक्के इतकी झाली असली तरी पावसाचा खंड पडल्याने खरिपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतरही नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीव्यवसायाचे गणित कोलमडून पडले आहे. सोयाबीन, मका आणि कापूस पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पिकांच्या वाढीवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या हाती थोडेफार पीक हाती लागते की नाही, याचीही चिंता आहे.

पावसाचा खंड पडल्याने सिन्नर, चांदवड आणि नांदगाव तालुक्यांतील काही मंडळांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. येथील पिकांची वाढ खुंटली आहे; तर पाण्याअभावी पिकांवर परिणाम होत असल्याने या तालुक्यांमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप काळ हा संकटाचा काळ असून आगोदरच शेतमालाचे पडलेले भाव आणि आता खरीपाच्या पिकांची चिंता अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकल्याने आगामी काळात शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतुदीची मागणी होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक