शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती हवी !

By admin | Updated: February 28, 2016 04:04 IST

सध्या देशभर देशद्रोह कायद्याची व्याप्ती आणि अर्थ यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १५५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या भारतीय दंड विधानात

कोची : सध्या देशभर देशद्रोह कायद्याची व्याप्ती आणि अर्थ यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १५५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या भारतीय दंड विधानात म्हणजेच फौजदारी कायद्यात (इंडियन पीनल कोड-आयपीसी) बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथे केले.पोलीस दलही गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काम करीत आहे. मात्र जगभरात पोलीस दलात व व्यवस्थेत अनेक बदल झाले असून, त्याच प्रकारे भारतातील पोलीस व्यवस्थाही बदलणे आवश्यक बनले आहे, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.भारतीय दंड विधानाला १५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कोचीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी तयार केलेल्या या कायद्याची अनेक कलमे आज कालबाह्य झाली आहेत. अनेक नवे गुन्हे समोर येत असून, त्यांच्याबाबतीत कायद्यात तरतुदी नसल्याचे जाणवत आहे. त्यापैकी काही गुन्हे शिक्षापात्र असले तरी जुन्या कायद्यात त्याविषयी उल्लेख नसल्याचेही आढळून येत आहे.अशा परिस्थितीत आयपीसीमध्ये कालानुरूप अनेक बदल करणे गरजेचे आहे. आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे देशाच्या विकासात, प्रगतीत अडथळे येत आहेत. अशा गुन्ह्यांसाठी अधिकाधिक कडक कायदे आवश्यक आहेत, असे प्रणव मुखर्जी यांनी नमूद केले.अनेकदा पोलीस ज्या प्रकारे कारवाई करतात, त्यावरून त्यांची जनमानसातील प्रतिमा बनत असते. एकतर्फी कायदा लागू करण्याच्या भूमिकेतून बाहेर येत पोलिसांनी पुढे जाणे गरजेचे आहे, असे पोलीस व्यवस्थेतील सुधारणांविषयी त्यांनी बोलून दाखवले.या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम् आणि मुख्यमंत्री ओमन चंडी हेही उपस्थित होते.व्याप्तीबाबत मतभिन्नताजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यावर देशद्रोहाच्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्यापासून देशात उलटसुलट चर्चा आहे. या कायद्याच्या व्याप्तीविषयीही मतभिन्नता आहे. कायद्यातील संबंधित १२४ अ या कलमात बदल करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे प्रतिपादन महत्त्वाचे ठरणार आहे.