शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

प्रेमासाठी कायपण! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी 'ती' प्रेयसीसोबत पळाली, नवऱ्याला आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 13:05 IST

पत्नी पळून गेल्याचं समजताच अवघ्या एक दिवसापूर्वी तिच्यासोबत लग्नबंधनात अडकलेल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरूणी आपल्या प्रेयसीसोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. समलैंगिक संबंधांच्या या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला असून पोलीसही हैराण झाले आहे. पत्नी पळून गेल्याचं समजताच अवघ्या एक दिवसापूर्वी तिच्यासोबत लग्नबंधनात अडकलेल्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी करावी लागली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि नातेवाईक पळून गेलेल्या तरुणींचा शोध घेत होते. खूप शोध घेतल्यानंतर मदुराईमध्ये तरुणी तिच्या प्रेयसीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली. सहा दिवसांच्या तपासानंतर तरुणीला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. तरुणीला आधीपासूनच तिच्या प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा होती. मात्र लग्नामध्ये माहेरच्यांकडून मोठ्याप्रमाणात सोनं मिळेल हे माहीत असल्याने तिने लग्न केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी या तरुणीचं त्रिशूरमधील चावाकड येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न झालं. 

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच 'ती' प्रेयसीसोबत दागिने घेऊन पसार

तरुणाने लग्न करुन घरी आणलेली पत्नी दुसऱ्याच दिवशी 25 ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झाली. पोलिसाने स्थानिक पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चेरपूर येथील एका बँकेत हे दोघे काही कामानिमित्त गेले होते. बँकेमध्ये नवरा काही कामानिमित्त थांबला असताना या तरुणीने त्याच्याकडून त्याच्या मोबाईल मागून घेतला. आपण आपल्या एका मैत्रिणीला भेटून काही वेळात आलोच असं सांगून ही तरुणी दुचाकीवरुन नवऱ्याचा मोबाईल घेऊन निघून गेली पण ती त्यानंतर परतलीच नाही. शेवटी परत न आल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली. 

तपासामध्ये या तरुणीने तिच्या प्रेयसीसोबत चेन्नईला पळून जाण्यासाठी त्याच दिवशी त्रिशूर ते चेन्नई तिकीट बूक केल्याची माहिती समोर आली. मात्र चेन्नईला जाण्याऐवजी या दोघी बसने कोट्टयमला गेल्या. नंतर दुसऱ्या दिवशी या दोघी ट्रेनने चेन्नईला गेल्या. त्यानंतर त्या चेन्नईवरुन मदुराईला गेल्या जिथे त्या एका लॉजमध्ये थांबल्या होत्या. मदुराईमध्ये एक दिवस राहिल्यानंतर त्या पुन्हा त्रिशुरला परतल्या. रेल्वे स्थानकावर पार्क केलेल्या दुचाकीची व्यवस्था करण्यासाठी त्या परतल्या होत्या. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात यश आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी