शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दिल्ली एनसीआरमधील गुन्ह्यांत दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:09 IST

‘कॅग’चे ताशेरे : पोलिसांना करावे लागते १५ तास काम

विकास झाडे ।

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यांमध्ये २७५ टक्के वाढ झाली आहे. तसेच, मनुष्यबळअभावी पोलिसांना ८ तासांऐवजी १२ ते १५ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्ह्यांचा तपास करणे यावर मोठा परिणाम झाला असल्याकडे कॅगने लक्ष वेधले आहे. कॅगने यासंदर्भात २३ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत अहवाल सादर केला आहे.

मुंबई पोलिसांच्या व्यक्तीगत सुरक्षा अ‍ॅपच्या तुलनेत दिल्ली पोलिसांचे ‘हिंमत’ अ‍ॅप अत्यंत प्रभावहीन असून अ‍ॅपच्या प्रचारावरच अतोनात खर्च करण्यात आल्याचे ताशेरे भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परिक्षकांनी (कॅग) ओढले आहेत. दिल्ली पोलिसांचे अ‍ॅप व्यस्त झाल्याचे जाणवते. याशिवाय दिल्ली पोलिसांचे सहा वेब अप्लीकेशन एचटीटीपीएस प्रोटोकॉलनुसार सुरक्षित नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आॅनलाईन एफआयआर नोंदवितांना फॉर्म भरावा लागतो परंतु पोलिसांच्या आयटीसेलकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.कॅगने काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे की, दिल्लीत २० टक्के घटनांमध्ये पीसीआर व्हॅनला पोहचायला ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. इथे पीसीआर व्हॅनची संख्या ही ६१७१ हवी परंतु सध्या ४१४१ व्हॅन उपलब्ध आहेत. त्यातील ५५ टक्के व्हॅनमध्ये पोलीस बंदुकाविनाच आहे. पोलिसांकडे असलेली संचार यंत्रणा (वायरलेस आदी) ही २० वर्षांपुर्वीची आहे.२०१८ मध्ये २ लाख ५१ हजार गुन्हे2013 मध्ये एनसीआरटीमध्ये ८० हजार भादंवि गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१८ मध्ये ही संख्या वाढून २ लाख ५१ हजारांवर गेली आहे. दिल्ली पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किमान ३३ टक्के असावी परंतु त्यांची टक्केवारी केवळ ११.७५च्या घरात आहे.च्पोलीस संशोधन आणि विभागाच्या मानदंडानुसार दिल्लीतील तपासण्यात आलेल्या ७२ पोलीस स्टेशनपैकी केवळ एका पोलिस स्टेशनमध्ये मनुष्यबळ पूर्ण होते.2018-19या आर्थिक वर्षात शहरातील ३८७० सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात आली त्यातील ३५ टक्क्यांपेक्षा अधिक कॅमेरे बंद होते. ड्युटीवर तैनात असलेल्यांच्या तुलनेत बुलेटप्रुफ जॅकेट्स कमी असल्याचे कॅगच्य निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली