शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दिल्ली एनसीआरमधील गुन्ह्यांत दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:09 IST

‘कॅग’चे ताशेरे : पोलिसांना करावे लागते १५ तास काम

विकास झाडे ।

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यांमध्ये २७५ टक्के वाढ झाली आहे. तसेच, मनुष्यबळअभावी पोलिसांना ८ तासांऐवजी १२ ते १५ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्ह्यांचा तपास करणे यावर मोठा परिणाम झाला असल्याकडे कॅगने लक्ष वेधले आहे. कॅगने यासंदर्भात २३ सप्टेंबर २०२० रोजी संसदेत अहवाल सादर केला आहे.

मुंबई पोलिसांच्या व्यक्तीगत सुरक्षा अ‍ॅपच्या तुलनेत दिल्ली पोलिसांचे ‘हिंमत’ अ‍ॅप अत्यंत प्रभावहीन असून अ‍ॅपच्या प्रचारावरच अतोनात खर्च करण्यात आल्याचे ताशेरे भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परिक्षकांनी (कॅग) ओढले आहेत. दिल्ली पोलिसांचे अ‍ॅप व्यस्त झाल्याचे जाणवते. याशिवाय दिल्ली पोलिसांचे सहा वेब अप्लीकेशन एचटीटीपीएस प्रोटोकॉलनुसार सुरक्षित नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आॅनलाईन एफआयआर नोंदवितांना फॉर्म भरावा लागतो परंतु पोलिसांच्या आयटीसेलकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.कॅगने काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे की, दिल्लीत २० टक्के घटनांमध्ये पीसीआर व्हॅनला पोहचायला ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. इथे पीसीआर व्हॅनची संख्या ही ६१७१ हवी परंतु सध्या ४१४१ व्हॅन उपलब्ध आहेत. त्यातील ५५ टक्के व्हॅनमध्ये पोलीस बंदुकाविनाच आहे. पोलिसांकडे असलेली संचार यंत्रणा (वायरलेस आदी) ही २० वर्षांपुर्वीची आहे.२०१८ मध्ये २ लाख ५१ हजार गुन्हे2013 मध्ये एनसीआरटीमध्ये ८० हजार भादंवि गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१८ मध्ये ही संख्या वाढून २ लाख ५१ हजारांवर गेली आहे. दिल्ली पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या किमान ३३ टक्के असावी परंतु त्यांची टक्केवारी केवळ ११.७५च्या घरात आहे.च्पोलीस संशोधन आणि विभागाच्या मानदंडानुसार दिल्लीतील तपासण्यात आलेल्या ७२ पोलीस स्टेशनपैकी केवळ एका पोलिस स्टेशनमध्ये मनुष्यबळ पूर्ण होते.2018-19या आर्थिक वर्षात शहरातील ३८७० सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात आली त्यातील ३५ टक्क्यांपेक्षा अधिक कॅमेरे बंद होते. ड्युटीवर तैनात असलेल्यांच्या तुलनेत बुलेटप्रुफ जॅकेट्स कमी असल्याचे कॅगच्य निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली