शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:35 IST

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

चामोली/हैद्राबाद/नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरे खचल्याने येथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून, आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. येथील लोकांना आपले घर काढून घेतल्याचे दु:ख असून, भविष्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर आहे. जोशीमठ भागातील केवळ २५ टक्के घरांना भेगा पडल्याचा दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला आहे.

दरम्यान वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेतील (एनजीआरआय) तज्ज्ञांचे एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तेथील भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी (सबसर्फेस मॅपिंग) करणार आहे.

पुनर्वसन सुरू 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून, पुनर्वसन पॅकेजही तयार केले जात आहे, अशी माहिती मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला देण्यात आली. 

कर्णप्रयाग, लंढौरसह अनेक ठिकाणीही संकट

जोशीमठमधील संकटाने अनेक वर्षांपासून भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जात असलेल्या उत्तराखंडमधील अन्य शहरांचा मुद्दा ऐरणीवर आला. कर्णप्रयाग व लंढौर या तीर्थक्षेत्रांसह अनेक ठिकाणे या संकटाला तोंड देत आहेत. कर्णप्रयागमधील बहुगुणा नगर येथे २०१५ पासून घरांना भेगा पडत आहेत. गोपेश्वरमधील चमोली जिल्हा मुख्यालयाचा काही भाग व गुप्तकाशीजवळील सेमी गाव अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. मसुरीतील लंढौर व ऋषिकेशजवळील अटाली गावातही घरांना तडे जात आहेत. सिंगतली, लोडसी, कौडियाळा आणि बावनी या गावांतही घरांना तडे जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.

संपूर्ण शहर धसण्याची शक्यता

इस्रोने उपग्रहाद्वारे जोशीमठ आपत्तीचा आढावा घेतला. तेव्हा भयावह चित्र समोर आले. उपग्रहाने दाखवलेल्या स्थितीनुसार संपूर्ण जोशीमठ शहर धसू शकते.  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यात लष्कराचे हेलिपॅड व नरसिंह मंदिर असलेल्या भागाखाली पाणी निचरा प्रणाली (मानवनिर्मित वा नैसर्गिक) असल्याचे समोर आले. पाण्यामुळे तेथील जमीन पोकळ झालेली असू शकते. विशेष म्हणजे याच भागावर शहर वसलेले आहे.

१९ सदस्यीय समिती

प्रत्येक बाधित कुटुंबाला १.५० लाख रुपयांची अंतरिम मदत वाटप व कोणत्या दराने भरपाई द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांच्या अध्यक्षतेखाली १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

बाधितांना बाजार दराप्रमाणे भरपाई देऊ 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाधितांचे हित लक्षात घेऊन बाजार दर ठरवेल. - पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड