शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:35 IST

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

चामोली/हैद्राबाद/नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरे खचल्याने येथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून, आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. येथील लोकांना आपले घर काढून घेतल्याचे दु:ख असून, भविष्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर आहे. जोशीमठ भागातील केवळ २५ टक्के घरांना भेगा पडल्याचा दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला आहे.

दरम्यान वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेतील (एनजीआरआय) तज्ज्ञांचे एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तेथील भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी (सबसर्फेस मॅपिंग) करणार आहे.

पुनर्वसन सुरू 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून, पुनर्वसन पॅकेजही तयार केले जात आहे, अशी माहिती मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला देण्यात आली. 

कर्णप्रयाग, लंढौरसह अनेक ठिकाणीही संकट

जोशीमठमधील संकटाने अनेक वर्षांपासून भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जात असलेल्या उत्तराखंडमधील अन्य शहरांचा मुद्दा ऐरणीवर आला. कर्णप्रयाग व लंढौर या तीर्थक्षेत्रांसह अनेक ठिकाणे या संकटाला तोंड देत आहेत. कर्णप्रयागमधील बहुगुणा नगर येथे २०१५ पासून घरांना भेगा पडत आहेत. गोपेश्वरमधील चमोली जिल्हा मुख्यालयाचा काही भाग व गुप्तकाशीजवळील सेमी गाव अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. मसुरीतील लंढौर व ऋषिकेशजवळील अटाली गावातही घरांना तडे जात आहेत. सिंगतली, लोडसी, कौडियाळा आणि बावनी या गावांतही घरांना तडे जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.

संपूर्ण शहर धसण्याची शक्यता

इस्रोने उपग्रहाद्वारे जोशीमठ आपत्तीचा आढावा घेतला. तेव्हा भयावह चित्र समोर आले. उपग्रहाने दाखवलेल्या स्थितीनुसार संपूर्ण जोशीमठ शहर धसू शकते.  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यात लष्कराचे हेलिपॅड व नरसिंह मंदिर असलेल्या भागाखाली पाणी निचरा प्रणाली (मानवनिर्मित वा नैसर्गिक) असल्याचे समोर आले. पाण्यामुळे तेथील जमीन पोकळ झालेली असू शकते. विशेष म्हणजे याच भागावर शहर वसलेले आहे.

१९ सदस्यीय समिती

प्रत्येक बाधित कुटुंबाला १.५० लाख रुपयांची अंतरिम मदत वाटप व कोणत्या दराने भरपाई द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांच्या अध्यक्षतेखाली १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

बाधितांना बाजार दराप्रमाणे भरपाई देऊ 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाधितांचे हित लक्षात घेऊन बाजार दर ठरवेल. - पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड