शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 07:35 IST

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

चामोली/हैद्राबाद/नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरे खचल्याने येथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून, आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. येथील लोकांना आपले घर काढून घेतल्याचे दु:ख असून, भविष्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर आहे. जोशीमठ भागातील केवळ २५ टक्के घरांना भेगा पडल्याचा दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला आहे.

दरम्यान वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेतील (एनजीआरआय) तज्ज्ञांचे एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तेथील भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी (सबसर्फेस मॅपिंग) करणार आहे.

पुनर्वसन सुरू 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून, पुनर्वसन पॅकेजही तयार केले जात आहे, अशी माहिती मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला देण्यात आली. 

कर्णप्रयाग, लंढौरसह अनेक ठिकाणीही संकट

जोशीमठमधील संकटाने अनेक वर्षांपासून भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जात असलेल्या उत्तराखंडमधील अन्य शहरांचा मुद्दा ऐरणीवर आला. कर्णप्रयाग व लंढौर या तीर्थक्षेत्रांसह अनेक ठिकाणे या संकटाला तोंड देत आहेत. कर्णप्रयागमधील बहुगुणा नगर येथे २०१५ पासून घरांना भेगा पडत आहेत. गोपेश्वरमधील चमोली जिल्हा मुख्यालयाचा काही भाग व गुप्तकाशीजवळील सेमी गाव अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. मसुरीतील लंढौर व ऋषिकेशजवळील अटाली गावातही घरांना तडे जात आहेत. सिंगतली, लोडसी, कौडियाळा आणि बावनी या गावांतही घरांना तडे जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.

संपूर्ण शहर धसण्याची शक्यता

इस्रोने उपग्रहाद्वारे जोशीमठ आपत्तीचा आढावा घेतला. तेव्हा भयावह चित्र समोर आले. उपग्रहाने दाखवलेल्या स्थितीनुसार संपूर्ण जोशीमठ शहर धसू शकते.  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यात लष्कराचे हेलिपॅड व नरसिंह मंदिर असलेल्या भागाखाली पाणी निचरा प्रणाली (मानवनिर्मित वा नैसर्गिक) असल्याचे समोर आले. पाण्यामुळे तेथील जमीन पोकळ झालेली असू शकते. विशेष म्हणजे याच भागावर शहर वसलेले आहे.

१९ सदस्यीय समिती

प्रत्येक बाधित कुटुंबाला १.५० लाख रुपयांची अंतरिम मदत वाटप व कोणत्या दराने भरपाई द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांच्या अध्यक्षतेखाली १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 

बाधितांना बाजार दराप्रमाणे भरपाई देऊ 

जोशीमठमधील बाधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाधितांचे हित लक्षात घेऊन बाजार दर ठरवेल. - पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड