शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या आरक्षित तिकिटांच्या रिफंडबाबत मध्य रेल्वेने केली महत्त्वपूर्ण घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 16:11 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे.

ठळक मुद्देरद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदतपरतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला हा निर्णय मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते

मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे. काही विशेष आणि नियमित गाड्या चालवण्यात येत असल्या तरी देशातील रेल्वे वाहतूक अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ट्रेन रद्द झाल्याने रद्द करण्यात आलेल्या आरक्षित तिकिटांच्या परताव्याबाबत मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेने रद्द झालेल्या तिकिटांच्या परताव्याबाबत या घोषणेतून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात लाखो तिकीट रद्द झालेली असल्याने परतावा मिळवण्यासाठी तिकी खिडक्यांवर गर्दी होत होती. 

तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत होते. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचा परतावा प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांमध्ये मिळवता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या