शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:14 IST

वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच.

सीमा महांगडे कोलकाता : वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच. मात्र इलेक्ट्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे आजूबाजूच्या वातावरणात सततच्या वाढणाऱ्या पॉझिटिव्ह आयन्समुळे आपल्याला थकवा येणे, डोकेदुखी, सुस्त वाटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. मात्र हवेतील हे प्रदूषण कमी कारण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत गाईच्या शेणाच्या वापर केला तर ? ऐकून सुरुवातीला विचित्र वाटत असले तरी हे संशोधन लवकरच बाजारात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरील त्याचा वापर सध्या भारतातील बंगळुरूसारख्या शहरात होत आहे. सीएसआयआर, बंगळुरूच्या आनंद कुमार, आर राजेंद्रन आणि आर के साकेत यांच्या टीमने हवेतील प्रदूषण आणि विशेषत: पॉझिटिव्ह आयन्स जे डोकेदुखी, थकवा यासाठी कारणीभूत ठरणाºया धन आयन आकर्षित करण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरीफायरचे संशोधन केले आहे,.नुकतेच जपानच्या काही डॉक्टरांनी हवेतील या धनप्रभारांचा आपल्या आरोग्यावर कसा घातक परिणाम होत असतो यावर संशोधन समोर आणले आहे. आपल्या दैनंदिन वापरातील कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर हाय फ्रिक्वेन्सी डिव्हायसेसमुळे त्या हवेतील पॉसिटीव्ह आयन्सचा संचार आणि प्रमाण वाढते. हे आयन्स आपल्या रक्तातील पेशींवर परिणाम करतात आणि रक्ताची अ‍ॅसिडिटी लेव्हल वाढते. यामुळे लॅक्टिक अ‍ॅसिडिटी प्रमाण वाढण्याची शक्यता असून ते थेट कॅन्सरकडेही जाऊ शकते. याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असून यामुळे थकवा, सुस्ती, कंटाळा येणे, ताकद नसणे सारख्या गोष्टी आपल्याला वाटू लागतात. या सगळ्यावर एकूणच हवेतील या इलेक्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे वाढणाºया पॉझिटिव्ह आयन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरिफायरचे संशोधन करण्यात आले आहे. या डिव्हाइसमध्ये गाईच्या शेणाचा वापर यात केलेला असल्यामुळे हवेतील बॅक्टरीया आणि व्हायरसेस आपल्याकडे आकर्षित करते आणि किमान हवा शुद्धीकरणास मदत करते.>प्रदूषणाचा विळखा कमी होणारया डिव्हाईसचा वापर कोठेही सहज केला जाऊ शकतो आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एअर प्युरिफायरच्या केमिकल्सना हा उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. केवळ गाईचे शेण आणि ?क्टिव्हेटेड कार्बन सारख्या सोप्या पद्धतींचा अवलंन असलेलय डिव्हाईसची किमंतही कोफायतशीर आहे. भारतीय सांस्कृतीतील पारंपरिक गोष्टी व पद्धतीचं आज आपल्याला वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढू शकणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आरोग्यावर होणारे वाईट परिणाम नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात असा विश्वास आनंद कुमार यांनी व्यक्त केला.