शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:55 IST

Corona Virus : भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांमध्ये अशी वाढ दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत सुमारे ५०० रुग्णांची वाढ झाली असून संख्या ५३६४ वर पोहोचली आहे, जी ५ जूनपर्यंत ४,८६६ होती. १५ दिवसांत कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण २० पटीने वाढले आहेत. २२ मे रोजी देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या २५७ होती, जी आता ५३६४ वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरिएंट अनेक राज्यांमध्ये लोकांना वेगाने संक्रमित करत आहेत आणि विळखा घालत आहे. सर्वात वाईट परिस्थिती केरळमध्ये आहे, जिथे कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये कोरोनाचे १६७९ रुग्ण आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये कोरोनाचे ६१५ एक्टिव्ह रुग्ण आहेत, पश्चिम बंगालमध्ये ५९६, दिल्लीत ५६२ आणि महाराष्ट्रात ५४८ रुग्ण आहेत.

धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

कोरोना स्वरूप बदलतोय

सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनिअर कंसलटेंट डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर एम वली यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट प्राणघातक नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे. आवश्यकता नसल्यास, घराबाहेर पडू नका. स्वच्छता ठेवा आणि मास्क घाला. यासाठी कोणत्याही लसीची आवश्यकता नाही. जर  अंगदुखी, खोकला आणि ताप अशी लक्षणं आढळली तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. घाबरण्याची गरज नाही. कोरोना त्याचं स्वरूप बदलत आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमध्ये हे जास्त आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगणं आणि मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनावर उपचार कसे करावे हे माहिती आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही.

कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा

सावधगिरी बाळगण्याची गरज 

कोरोना व्हायरसबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि कोरोनाची लक्षणं आढळल्यास ताबडतोब चाचणी करणं महत्त्वाचं आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि अनेक राज्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतKeralaकेरळ