शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:55 IST

Corona Virus : भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांमध्ये अशी वाढ दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत सुमारे ५०० रुग्णांची वाढ झाली असून संख्या ५३६४ वर पोहोचली आहे, जी ५ जूनपर्यंत ४,८६६ होती. १५ दिवसांत कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण २० पटीने वाढले आहेत. २२ मे रोजी देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या २५७ होती, जी आता ५३६४ वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरिएंट अनेक राज्यांमध्ये लोकांना वेगाने संक्रमित करत आहेत आणि विळखा घालत आहे. सर्वात वाईट परिस्थिती केरळमध्ये आहे, जिथे कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये कोरोनाचे १६७९ रुग्ण आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये कोरोनाचे ६१५ एक्टिव्ह रुग्ण आहेत, पश्चिम बंगालमध्ये ५९६, दिल्लीत ५६२ आणि महाराष्ट्रात ५४८ रुग्ण आहेत.

धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

कोरोना स्वरूप बदलतोय

सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनिअर कंसलटेंट डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर एम वली यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट प्राणघातक नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे. आवश्यकता नसल्यास, घराबाहेर पडू नका. स्वच्छता ठेवा आणि मास्क घाला. यासाठी कोणत्याही लसीची आवश्यकता नाही. जर  अंगदुखी, खोकला आणि ताप अशी लक्षणं आढळली तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. घाबरण्याची गरज नाही. कोरोना त्याचं स्वरूप बदलत आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमध्ये हे जास्त आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगणं आणि मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनावर उपचार कसे करावे हे माहिती आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही.

कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा

सावधगिरी बाळगण्याची गरज 

कोरोना व्हायरसबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि कोरोनाची लक्षणं आढळल्यास ताबडतोब चाचणी करणं महत्त्वाचं आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि अनेक राज्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतKeralaकेरळ