शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जयललितांना कोर्टाने सुनावले

By admin | Updated: August 25, 2016 04:54 IST

राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी अब्रुनुकसानीच्या दाव्याचा शस्त्रासारखा उपयोग करता येणार नाही

नवी दिल्ली : राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी अब्रुनुकसानीच्या दाव्याचा शस्त्रासारखा उपयोग करता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बुधवारी सुनावले. लोकशाहीचा गळा आवळण्यासाठी तुम्ही अब्रुनुकसानीच्या खटल्याचा उपयोग करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांच्या वकिलांना ऐकवले. न्यायालयाने या पूर्वी जुलैतही याच मुद्द्यावरून त्यांना फटकारले होते. आपल्यावर टीका करणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल करण्याऐवजी तामिळनाडू सरकारने सुशासनावर भर द्यावा, असेही न्यायालयाने सुनावले. तामिळनाडू सरकारने केलेल्या अब्रुनुकसानीचा दाव्याविरुद्ध डीएमडीकेचे प्रमुख ए. विजयकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निरीक्षणे नोंदविली. राजकीय विरोधकांविरुद्ध अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यासाठी सरकार शासन व्यवस्थेचा उपयोग करू शकत नाही, असेही न्यायालयाने ठामपणे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)