शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:29 IST

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली - वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वंदे मातरमला आतापर्यंत जन-गन-मन सारखा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे  न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली होती.  भाजपाशी संबंधित असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले पाहिजे. तसेच त्यासाठी एक राष्ट्रीय धोरण बनवले गेले पाहिजे, अशी मागणी उपाध्याय यांना या याचिकेमधून केली होती.  दरम्यान, वंदे मातरमला अनिवार्य बनवण्याबाबत काही धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे. वंदे मातरममध्ये देशाला माता मानून त्याची स्तुती करण्यात आली आहे. आपला धर्म त्याला मान्यता देत नाही. त्यामुळेच आदेशाद्वारे हा निर्णय थोपवता येणार नाही, असे या संघटनांचे म्हणणे होते.  याआधी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, संविधानातील कलम 51(अ) म्हणजेच मुलभूत कर्तव्यांमध्ये केवळ जन-गण-मन आणि राष्ट्रीय ध्वजाचाच उल्लेख आहे. तामुळे वंदे मातरमला अनिवार्य करता येणार नाही. आता दिल्ली हायकोर्टानेही अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना अशीच टिप्पणी केली आहे.  

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमHigh Courtउच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली