शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अटकपूर्व जामीन हवाय? मग केरळमधील पूरग्रस्तांना मदत करा; हायकोर्टाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 12:34 IST

तीन आरोपींना केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेश

रांची: झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यासाठी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याची अट घातली आहे. अटकपूर्व जामीन हवा असल्यास, केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये ठराविक रक्कम जमा करा, असे आदेश झारखंड उच्च न्यायालयानं तीन आरोपींना दिले आहेत. महापुरामुळे प्रचंड वाताहत झालेल्या केरळला मदतीची गरज असल्यानं न्यायमूर्ती ए. बी. सिंह यांनी तीन आरोपींना पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या. न्यायमूर्ती सिंह यांनी आरोपी उत्पल रायला अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र त्याआधी त्याला केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये 7 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले. उत्पल रायवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय ज्ञानेश्वर मंडल आणि संभू मंडल यांनाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना जामीन देण्याआधी केरळमधील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या.आरोपींनी पूरग्रस्तांना मदत केल्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्याचे आदेशदेखील न्यायमूर्ती सिंह यांनी दिले. झारखंड उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे हेमंत कुमार सिकरवार यांनी न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे. केरळमधील भीषण स्थिती लक्षात घेऊन मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील उच्च न्यायालयांनीदेखील अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, याची आठवणदेखील त्यांनी करुन दिली आहे.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरHigh Courtउच्च न्यायालय