शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

आरक्षित तिकीट असतानाही प्रवाशांना बसायला दिली नाही जागा, ग्राहक न्यायालयाचा रेल्वेला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 18:00 IST

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका न्यायालयानं भारतीय रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही प्रवाशाला बसायला सीट न दिल्यानं त्या प्रवाशानं रेल्वेविरोधात न्यायालयात दाद मागितली.

बंगळुरू- कर्नाटकातल्या म्हैसूरमधील एका प्रकरणात ग्राहक न्यायालयानं भारतीय रेल्वेला चांगलाच झटका दिला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही जयपूर-म्हैसूर असा प्रवास करणा-या तीन प्रवाशांना बसायला सीट न दिल्यानं ग्राहक न्यायालयानं त्या प्रवाशांना 37 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.टीटीई आणि आरपीएफकडे तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनानं त्या प्रवाशांची दखल न घेतल्यानं अखेर त्या प्रवाशांना न्यायासाठी ग्राहक न्यायालयात जावं लागलं. ग्राहक न्यायालयानं त्यावर निर्णय देताना रेल्वे प्रशासनाला 37 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. जयपूर-म्हैसूर सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करणा-या तीन जागांचं आरक्षण केलेल्या कुटुंबीयांच्या जागेवर दुस-याच प्रवाशांनी कब्जा केला होता. त्यामुळे तिकीट असूनही त्या प्रवाशांना जवळपास 33 तास त्रासदायक प्रवास करावा लागला. एकाच कुटुंबातील तिन्ही प्रवाशांनी या प्रवासासाठी प्रत्येकी 740 रुपयांचं तिकीट काढलं होतं. 

प्रवाशांनी या प्रकारात न्याय मिळावा, यासाठी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयानं या प्रकारावर टीका करत ड्युटीवर कार्यरत असलेला टीटीई आणि आरपीएफ कर्मचा-यांना खडे बोल सुनावले. म्हैसूरमधील सिद्धार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जयपूर-म्हैसूर सुपरफास्ट ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी 25 मे 2017 रोजी तिकीट आरक्षित केले. परंतु आरक्षित तिकीट असतानाही त्यांना त्यांच्या जागेवर अनारक्षित प्रवाशांनी बसू दिले नाही.उज्जैन स्टेशनवर ट्रेनमध्ये चढल्यानंतर एस 5 या बोगीतील त्यांच्या आरक्षित तिकिटांवर दुस-याच लोकांना कब्जा केला होता. एस 5 हा पूर्ण डबा अनारक्षित लोकांनी भरलेला होता. या प्रवाशांनी जवळपास 33 तासांनंतर स्वतःची जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही अयशस्वी ठरला. इतकेच नव्हे तर त्यांनी टीटीई आणि आरपीएफकडे तक्रारही दाखल केली. परंतु टीटीई आणि आरपीएफनं कोणतीही कारवाई केली नाही. सिद्धार्थ यांनी भारतीय रेल्वेकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली नाही. अखेर त्यांनीही याबाबत न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावेळी न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना दंड देण्यास सांगितले. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे