शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धक्कादायक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:27 IST

लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला.

नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. लग्नाचं फोटोशूट करणं एका नवं दाम्पत्याच्या जीवावर बेतलं आहे. लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला. त्यामुळे नव दाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. केरळमधील (Keral News) जानकीकाडूनजवळील कुट्टियाडी नदीच्या किनारी ही घटना घडली आहे. सोमवारी येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते. 

फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. 14 मार्च रोजी दोघं लग्न बंधनात अडकले होते. नवरदेवाचं नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.

पेरूवन्नमुझी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते. आणि ते उत्साहाच्या भरात नदीत जातात. रेजिलला पोहता येत नव्हतं. खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. तपासाअंती घडलेल्या प्रकाराबद्दल नेमकं सांगता येईल. नवरदेवाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने अनेक कारणांमुळे आऊटडोर वेडिंग शूट 4 एप्रिलपर्यंत पोस्टपोंड करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून फोटोशूट सुरू केलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Keralaकेरळmarriageलग्न