शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:27 IST

लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला.

नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. लग्नाचं फोटोशूट करणं एका नवं दाम्पत्याच्या जीवावर बेतलं आहे. लग्नाला अवघे 20 दिवसच झाले असताना नवरा आणि नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला. त्यामुळे नव दाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. केरळमधील (Keral News) जानकीकाडूनजवळील कुट्टियाडी नदीच्या किनारी ही घटना घडली आहे. सोमवारी येथे नवरा आणि नवरी फोटोशूटचा आनंद घेत होते. 

फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. या घटनेत नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं आणि एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात नवरीलाही गंभीर जखम झाली आहे. 14 मार्च रोजी दोघं लग्न बंधनात अडकले होते. नवरदेवाचं नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.

पेरूवन्नमुझी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते. आणि ते उत्साहाच्या भरात नदीत जातात. रेजिलला पोहता येत नव्हतं. खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. तपासाअंती घडलेल्या प्रकाराबद्दल नेमकं सांगता येईल. नवरदेवाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने अनेक कारणांमुळे आऊटडोर वेडिंग शूट 4 एप्रिलपर्यंत पोस्टपोंड करण्यात आले होते. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून फोटोशूट सुरू केलं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Keralaकेरळmarriageलग्न