शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं पण..."; जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:01 IST

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आपापसात झालेल्या वादातून पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने त्यांच्या पालकांना उद्देशून एक सुसाइड नोट ठेवली.

संपूर्ण घटना बिजनौरच्या हल्दौरमध्ये घडली, जिथे काल रात्री काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला, तर अंकुर अजूनही रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे ज्यात लिहिलं आहे की, "मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आहे पण आता आमची वेळ आली आहे. आम्ही छोटासा जीव (मुलगी) तुमच्या हातात सोपवत आहोत. जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा आम्ही दोघेही हे जग सोडून गेलेलो असू. आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत." 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर रात्री हॉटेलमधून जेवण करून घरी आला होता. पत्नीसाठी दाल मखनी आणि इतर खाद्यपदार्थ आणले होते. मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर एकाच वेळी दोघांची प्रकृती खालावली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. या दाम्पत्याने विषारी पदार्थ खाल्ल्याचं निष्पन्न झालं.दोघांनाही तत्काळ बिजनौर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. 

अंकुरची प्रकृतीही चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. याच दरम्यान, पोलिसांनी शिवानीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे अंकुरच्या प्रकृतीसाठी कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. या जोडप्याला 8 महिन्यांची मुलगी आहे.