शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं पण..."; जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:01 IST

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये आपापसात झालेल्या वादातून पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने त्यांच्या पालकांना उद्देशून एक सुसाइड नोट ठेवली.

संपूर्ण घटना बिजनौरच्या हल्दौरमध्ये घडली, जिथे काल रात्री काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला, तर अंकुर अजूनही रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे ज्यात लिहिलं आहे की, "मम्मी, पप्पा... तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आहे पण आता आमची वेळ आली आहे. आम्ही छोटासा जीव (मुलगी) तुमच्या हातात सोपवत आहोत. जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा आम्ही दोघेही हे जग सोडून गेलेलो असू. आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत." 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर रात्री हॉटेलमधून जेवण करून घरी आला होता. पत्नीसाठी दाल मखनी आणि इतर खाद्यपदार्थ आणले होते. मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर एकाच वेळी दोघांची प्रकृती खालावली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. या दाम्पत्याने विषारी पदार्थ खाल्ल्याचं निष्पन्न झालं.दोघांनाही तत्काळ बिजनौर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला. 

अंकुरची प्रकृतीही चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. याच दरम्यान, पोलिसांनी शिवानीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे अंकुरच्या प्रकृतीसाठी कुटुंबीय प्रार्थना करत आहेत. या जोडप्याला 8 महिन्यांची मुलगी आहे.