शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिला पर्वतीय महामार्ग खुला

By admin | Updated: May 2, 2015 10:23 IST

मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या खासी या विशाल पर्वतरांगाना फोडून पूर्वोत्तरातील सात राज्यांना जोडणारा देशातील पहिला चार पदरी पर्वतीय राष्ट्रीय महामार्ग शुक्र वारी देशाला समर्पित करण्यात आला.

रघुनाथ पांडे, शिलाँग (मेघालय)मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या खासी या विशाल पर्वतरांगाना फोडून पूर्वोत्तरातील सात राज्यांना जोडणारा देशातील पहिला चार पदरी पर्वतीय राष्ट्रीय महामार्ग शुक्र वारी देशाला समर्पित करण्यात आला. या महामार्गामुळे आंतरराष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जाईल. दिल्ली पाटणामार्गे शिलाँग असा मार्ग जोडला गेला. भविष्यात शिलाँग ते म्यान्मार असा मार्ग बांधण्याची योजना प्रत्यक्षात येणार आहे; त्या नियोजनाचा आज श्रीगणेशा झाला.शिलाँग ते गुवाहाटी हे सहा तासांचे अंतर यामुळे तीन तासांवर आले. दररोज १२ हजार वाहने येथून जातील. आलं, बटाटे ,सफरचंदाचा व्यापार, कोळशाची वाहतूक आणि १५० कोटीने पर्यटन वाढेल. १८ नवी तांत्रिक महाविद्यालये इथे सुरु होत आहेत, त्यांना यामुळे सुविधा होईल. चार वीज प्रकल्प यामुळे वेळेत सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त होते. विशेष म्हणजे या भागाच्या केवळ रस्ते विकासावर १५ हजार कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. या राज्यांचा एवढा अर्थसंकल्पही नाही. मेघालय सरकारकडे राज्यातील रस्ते दुरु स्त करायला निधी नाही; अशावेळी केंद्र सरकार मदतीला धावून आले आणि राज्याला स्थैर्य दिले अशी प्रांजळ कबुली मेघालयाच्या उपमुख्यमंत्र्यानी दिली.शिलाँगच्या रिवॉई जिल्ह्यातील उम्मेयंन गावाच्याकडेला कोनशिलेचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले, तेव्हा या दोन्ही राज्यातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जोरबत ते बारपानी (६२ किमी) तसेच शिलांग बायपास (७४ किमी)हे दोन महामार्ग बांधले. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ असा नवा क्र मांकही दिला गेला.त्रिपुरा, आसाम, मिझोरम, मणिपूर, मेघालय, नागालँड ही राज्ये आणि प.बंगालच्या उत्तरपूर्व भागाला या मार्गाने जोडल्याने सुरक्षा, संरक्षण,पर्यटन आणि उद्योगाचे दार खुले झाले अशी भावना या भागातील जनतेची आहे. सुमारे एक हजार कोटींचे हे दोन्ही मार्ग २०१० मध्ये मंजूर झाले. २०१३ मध्ये मागील काम पूर्ण होणार होते; मात्र निम्मे काम रखडले होते. मागील १० महिन्यात ते विक्र मी गतीने पूर्ण करण्यात आले. एक मोठा व १३ लहान पूल या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे या मार्गाचे रीतसर उद्घाटन आज झाले तरी वाहतुकीची गरज लक्षात घेऊन दीड महिन्यापासून जोरबत ते बारपानी मार्ग खुला केला होता.मेघालयाचे उपमुख्यमंत्री रोह लिंगडोह, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरम रजिुजु यांनी लोकांच्या भावना खुल्या दिलाने मांडल्या. त्यांनी गडकरी यांच्या धडाडीचे कौतुक केले. दहा महिन्यांतील या मार्गाची प्रगती विलक्षण आहे. हा रस्ता म्हणजे या भागातील जनतेसाठी देणगी आहे असे सांगून १०वर्षे रखडलेले मार्ग १० महिन्यात मार्गी कसे लागतील याविषयी जनतेत उत्सुकता होती. कारण यातील ४६ दिवस पाऊस होता. पण गडकरी यांनी ते शक्य केले.देशातील रस्ते हा विकासाचा कणा असून केवळ भूसंपादनातील विलंबामुळे ३लाख ८० हजार कोटींचे प्रकल्प थांबले असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, राज्यांनी भूसंपादनातील अडचणी दूर केल्या व पर्यावरण विभागाची परवानगी दिली तर प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. देशातील २६ मोठे प्रकल्प भूसंपादनातील अडचणींमुळे रखडले आहेत. त्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेऊ.पूर्वोत्तरातील रस्ते बांधकाम इतर राज्यांच्या तुलनेत चारपट महाग असले तरी हा भाग देशाशी जोडण्याच्या कामी कोणतीच दिरंगाई सहन केली जाणार नाही. या भागासाठी स्वतंत्र राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ केंद्र स्थापन करत असून त्याचे मुख्यालय गुवाहाटीला असेल अशी घोषणा गडकरी यांनी केली.