शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:20 IST

सोनिया गांधींचे केेंद्र सरकारवर टीकास्त्र; सर्वपक्षीय बैठक बोलवा

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हताळण्यासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत असल्याची कडाडून टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. विषाणूविरुद्धचा लढा आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेला असून देशाला आता एकत्रपणे लढावे लागेल, अशी भूमिका सोनिया गांधींनी मांडली. मोदी सरकारने कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी तत्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, देशाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाला नागरिकांप्रती कसलीही सहानुभूती नसून केंद्र सरकारने जनतेला अपयशी केले आहे. देशाची यंत्रणा अपयशी झालेली नाही. भारताची बलस्थाने आण‍ि संसाधनांचा योग्य वापर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. हा लढा सरकारविरुद्ध नसून कोरोनाविरुद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कृती आणि उत्तरदायित्व ठरविण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत सोनिया गांधींनी प्रथमच मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या