शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 08:43 IST

केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

फरिदाबादः देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज असून, ती उपलब्ध झाल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मानव रचना शैक्षणिक संस्था येथे इंडिया वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी बोलत  होते.  ते म्हणाले की, केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.कामगार, जमीन, कायदा, रसद आणि तरलता या पाच मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. ही पंचसूत्री देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनची लॉजिस्टिक किंमत 8 टक्के, भारताची 13 टक्के आणि अमेरिकेची 12 टक्के आहे, ती कशी कमी करावी याचा विचार केला पाहिजे. 1947पूर्वी आणि नंतर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. देशातील नागरिकांनी नेहमीच सकारात्मक ऊर्जेनं अशा आव्हानांचा सामना केला. सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला हातभार लागणार आहे. ज्यांच्याकडे भाकरी, कपडे आणि घरे नाहीत त्यांच्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे. उद्योग, स्मार्ट शहरे आणि स्मार्ट व्हिलेज स्थापित करण्यासाठी सुमारे 115 जिल्ह्यांशी चर्चा केली आहे, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं धोरण विकासवादी आहे. गरिबी हटवण्यासाठी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील. जास्त उत्पादन करणे आणि अधिकाधिक लोकांना रोजगार देण्यावर मला नेहमीच विश्वास आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात लोक खूप नकारात्मक झाले आहेत, त्यांना सकारात्मक, आनंदी, समृद्ध आणि सक्षम बनले पाहिजे, असंही गडकरींनी सांगितलं आहे. 

हेही वाचा

मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

आजचे राशीभविष्य - 5 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरी धंद्यात लाभ होईल अन् जादा उत्पन्न मिळेल

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी