शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 08:43 IST

केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

फरिदाबादः देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज असून, ती उपलब्ध झाल्यास अर्थव्यवस्था सुधारेल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मानव रचना शैक्षणिक संस्था येथे इंडिया वेबलॉगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन गडकरी बोलत  होते.  ते म्हणाले की, केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.कामगार, जमीन, कायदा, रसद आणि तरलता या पाच मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे. ही पंचसूत्री देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. चीनची लॉजिस्टिक किंमत 8 टक्के, भारताची 13 टक्के आणि अमेरिकेची 12 टक्के आहे, ती कशी कमी करावी याचा विचार केला पाहिजे. 1947पूर्वी आणि नंतर देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. देशातील नागरिकांनी नेहमीच सकारात्मक ऊर्जेनं अशा आव्हानांचा सामना केला. सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला हातभार लागणार आहे. ज्यांच्याकडे भाकरी, कपडे आणि घरे नाहीत त्यांच्यासाठी सरकारने धोरण आखले पाहिजे. उद्योग, स्मार्ट शहरे आणि स्मार्ट व्हिलेज स्थापित करण्यासाठी सुमारे 115 जिल्ह्यांशी चर्चा केली आहे, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं धोरण विकासवादी आहे. गरिबी हटवण्यासाठी आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील. जास्त उत्पादन करणे आणि अधिकाधिक लोकांना रोजगार देण्यावर मला नेहमीच विश्वास आहे. ते म्हणाले की, आजच्या काळात लोक खूप नकारात्मक झाले आहेत, त्यांना सकारात्मक, आनंदी, समृद्ध आणि सक्षम बनले पाहिजे, असंही गडकरींनी सांगितलं आहे. 

हेही वाचा

मोदींच्या शुभेच्छांवर ट्रम्प म्हणाले; "थँक्यू माझ्या मित्रा, अमेरिका भारतावर प्रेम करतो"

मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम 

आजचे राशीभविष्य - 5 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरी धंद्यात लाभ होईल अन् जादा उत्पन्न मिळेल

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी