शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:11 IST

तामागो प्रजातीचा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खातोय भाव

जबलपूर: आंबा आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं तसं अवघडच. फळांचा राजा असलेल्या आंब्याला भारतातच नव्हे तर जगभरातून मागणी असते. दरवर्षी आंब्याची किंमत वाढते. पण तरीही आंबाप्रेमी आंब्यावर ताव मारतात. आंब्याचं नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग खिसा थोडा रिकामा करून आंब्याची खरेदी होते. मात्र जबलपूरमध्ये पिकणारा आंबा खिसा नव्हे, तर संपूर्ण बँक खातं रिकामं करू शकतो. जबलपूरमध्ये पिकणाऱ्या एका आंब्याची किंमत तब्बल २.७० लाख रुपये इतकी आहे. इंटरनेटवर सध्या या आंब्याची किंमत एक ते दोन लाख रुपये आहे. याबद्दल स्थानिक कृषी अधिकाऱ्याना विचारलं असता, त्यांनी आंब्याच्या बगिच्यात जाऊन पाहणी करणार असल्याचं सांगितलं. जपानी आंबा तामागो नावानं ओळखला जातो. भारतात इतर कुठेही या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच त्याला मिळणारा दरदेखील जास्त आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खाणाऱ्या आंब्याला जपानी भाषेत 'ताईयो नो तामागो' म्हणतात. भारतात आंब्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील हापूस आंबा सर्वाधिक महागडा आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जपानचा आंबा सर्वात महाग विकला जातो. आता तामागो आंबा मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्येदेखील पिकू लागला आहे. चरगवामध्ये वास्तव्यास असलेल्या संकल्प परिहार यांनी तामागो आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. संकल्प यांनी ४ एकरावर आंब्यांच्या १४ विविध प्रजातींची लागवड केली आहे. त्यांनी तामागो आंब्याची ५२ झाडं लावली आहे. 

टॅग्स :Mangoआंबा