शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirusnews: विवाहापूर्वीच नवरी पॉझिटीव्ह निघाली, तरीही नवरदेवानं लग्नगाठ बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 19:59 IST

विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता.

सलेम - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत चार हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या वर गेली आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान तामिळनाडूतील एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. गेल्या ५ महिन्यांपासून त्या दोघांनी या क्षणाची वाट पाहिली होती, पण शुभ मंगल होण्यावर कोरोनाचं सावट, त्यात नवरी पॉझिटीव्ह निघाल्याने मोठी अडचण झाल. पण, सगळं पार पडलं. 

विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता. त्यामुळे, नियमानुसार तीची कोरोना चाचणी घेण्यात आली. तिरुपूर येथील गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या तिच्या भावी जोडीदारासोबत रविवारी या दोघांचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, शनिवारीच ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची धक्कादायक बातमी समोर आली. तरीही, लग्नाची सर्व तयारी झाली असल्याने तिच्या नातेवाईकांनी लग्नसोहळ्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, संबंधित बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शक्य नव्हती. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठक घेऊन 5 अटींसह या लग्नसोहळ्याला परवानगी दिली. त्यामुळे, सोहळा पार पडला. 

गंगावली येथील मुलाच्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला, त्यानंतर नवऱ्या मुलासह २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. मानवतेच्या दृष्टीकोनातून मी या लग्नसोहळ्याला काही अटी व शर्तींसह परवानगी दिल्याचं सलेमचे जिल्हाधिकारी एसए रमन यांनी म्हटले आहे. सध्या या लग्नसोहळ्यातील नवरा-नवरीसह ३० जण क्वारंटाईन करण्यात आल्याचेही रमन यांनी सांगितले. 

दरम्यान, देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सध्या देशभरात 31 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.

 

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूcollectorजिल्हाधिकारी