शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:26 IST

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यानं मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं आहे. कोरोनाविरोधात सगळा देश एकवटला असता तरी राजकीय नेत्यांचं राजकारण सुरूच आहे. अनेक राजकीय नेते कोरोनाच्या गंभीर परिस्थितही एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्येही आता राजकीय नाट्याला वेग आला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करायची होती म्हणूनच मोदी सरकारनं कोरोनासंदर्भात उशिरानं उपाययोजना केली, असा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, त्यामुळे जनतेचं भवितव्यच धोक्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारावर आता अभिनेते मनोज जोशी व्यक्त झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. मध्य प्रदेशमधल्या भाजपा सरकारचं सध्या मंत्र्यांशिवाय कामकाज सुरू असल्यानं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना टेन्शन आलं आहे. परंतु तुमचा कॉंग्रेस पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय. कोणतीही विचारधारा नाही, नेता नाही... कार्यकर्ता नाही', असं ट्विट करत मनोज जोशींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश