शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

CoronaVirus नरेंद्र मोदी धाडसी निर्णयाच्या तयारीत; देशात आर्थिक आणीबाणी लागू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:19 IST

राज्यांचे सर्व अधिकार गोठणार, १ मे पासून दोन महिन्यांसाठी आणीबाणीची शक्यता

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यांसंदर्भात कोविड कृती दलाशी चर्चा केली. ही आणीबाणी कलम ३६० अन्वये राष्ट्रपती जाहीर करतील. त्याक्षणी राज्यांचे आर्थिक अधिकार गोठतील व खर्चाचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असलीत. राज्यांच्या अखत्यारित येणाºया सर्व खर्चावर केंद्राचेच नियंत्रण असेल.

कोरोनानंतरच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने सध्या जाहीर केलेले आर्थिक पॅकेज जीडीपीच्या केवळ १ टक्के आहे. अमेरिकेने जीडीपीच्या १० टक्के पॅकेज घोषीत केले आहे. कोरोना पॅकेज जीडीपीच्या किमान तिप्पट करण्यासाठी या आणीबाणीचा अवलंब केला जाईल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने भारतात ४० कोटी बेरोजगार होण्याची भिती वर्तवली आहे. याचा विचार करूनच १ मे रोजी आर्थिक आणीबाणी जाहीर होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

वित्तीय तूट जीडीपीच्या ३.८ टक्के असल्याने आर्थिक संकटाची चाहूल लागली होती. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारची प्रतिबद्धता एफआरबीएम कायद्यान्वये असते. आर्थिक आणीबाणी जाहीर केल्यास एफआरबीएममधून केंद्राची सूटका होईल.खासदारांना मिळणारा वार्षिक निधीदेखील केंद्राच्या तिजोरीत जमा होईल. पुढचे दोन वर्षे १० कोटी रुपये खासदारांना मिळणार नाहीत. केंद्र सरकारचे जवळपास त्यातून ९ हजार कोटी वाचतील.

आर्थिक आणीबाणीचा उपायच का?कोरोनाच्या सामन्यासाठी राज्य सरकारांनी विविध पॅकेज जाहीर केले. त्यावर केंद्राचे नियंत्रण नाही. राज्ये या निधीसाठी केंद्राकडेच विचारणा करणार. देशभर खर्च, योजनांचा समन्वय असावा यासाठीदेखील आणीबाणी गरजेची असल्याचा दावा सूत्रांनी केला. मूडीच्या अहवालानुसार गेल्या १८ दिवसांमध्ये परदेशी कंपन्यांनी १.८० लाख कोटी रूपयांची गुतंवणूक भारतातून काढली. त्याचाही फटका अर्थव्यवस्थेला बसला.आणीबाणीत राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असेल. त्यातून सरासरी पाच हजार कोटी रुपये वाचवण्याची केंद्राची योजना आहे. राज्यांच्या योजनांवरही खर्चाची परवानगी केंद्र सरकारच देईल. पुढील दोन महिन्यांसाठी ही आणीबाणी असेल. मात्र आणीबाणीचा कालावधी वाढवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाची संमती आवश्यक असेल.

१८ हजार कोटींचे कर परतावे तत्काळनवी दिल्ली : प्राप्तीकर, वस्तू व सेवाकर (जीएसटी) व सीमाशुल्काचे (कस्टम्स) प्रलंबित असलेले सुमारे १८ हजार कोटींचे परतावे (रिफंड) तत्काळ अदा करण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केला. यामुळे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सुमारे १५ लाख व्यावसायिक, व्यापारी व लघु तसेच अतिलघु उद्योजकांच्या हाती अधिक पैसा येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक