शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

CoronaVirus नरेंद्र मोदी धाडसी निर्णयाच्या तयारीत; देशात आर्थिक आणीबाणी लागू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 06:19 IST

राज्यांचे सर्व अधिकार गोठणार, १ मे पासून दोन महिन्यांसाठी आणीबाणीची शक्यता

टेकचंद सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी यांसंदर्भात कोविड कृती दलाशी चर्चा केली. ही आणीबाणी कलम ३६० अन्वये राष्ट्रपती जाहीर करतील. त्याक्षणी राज्यांचे आर्थिक अधिकार गोठतील व खर्चाचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असलीत. राज्यांच्या अखत्यारित येणाºया सर्व खर्चावर केंद्राचेच नियंत्रण असेल.

कोरोनानंतरच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने सध्या जाहीर केलेले आर्थिक पॅकेज जीडीपीच्या केवळ १ टक्के आहे. अमेरिकेने जीडीपीच्या १० टक्के पॅकेज घोषीत केले आहे. कोरोना पॅकेज जीडीपीच्या किमान तिप्पट करण्यासाठी या आणीबाणीचा अवलंब केला जाईल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने भारतात ४० कोटी बेरोजगार होण्याची भिती वर्तवली आहे. याचा विचार करूनच १ मे रोजी आर्थिक आणीबाणी जाहीर होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

वित्तीय तूट जीडीपीच्या ३.८ टक्के असल्याने आर्थिक संकटाची चाहूल लागली होती. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारची प्रतिबद्धता एफआरबीएम कायद्यान्वये असते. आर्थिक आणीबाणी जाहीर केल्यास एफआरबीएममधून केंद्राची सूटका होईल.खासदारांना मिळणारा वार्षिक निधीदेखील केंद्राच्या तिजोरीत जमा होईल. पुढचे दोन वर्षे १० कोटी रुपये खासदारांना मिळणार नाहीत. केंद्र सरकारचे जवळपास त्यातून ९ हजार कोटी वाचतील.

आर्थिक आणीबाणीचा उपायच का?कोरोनाच्या सामन्यासाठी राज्य सरकारांनी विविध पॅकेज जाहीर केले. त्यावर केंद्राचे नियंत्रण नाही. राज्ये या निधीसाठी केंद्राकडेच विचारणा करणार. देशभर खर्च, योजनांचा समन्वय असावा यासाठीदेखील आणीबाणी गरजेची असल्याचा दावा सूत्रांनी केला. मूडीच्या अहवालानुसार गेल्या १८ दिवसांमध्ये परदेशी कंपन्यांनी १.८० लाख कोटी रूपयांची गुतंवणूक भारतातून काढली. त्याचाही फटका अर्थव्यवस्थेला बसला.आणीबाणीत राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असेल. त्यातून सरासरी पाच हजार कोटी रुपये वाचवण्याची केंद्राची योजना आहे. राज्यांच्या योजनांवरही खर्चाची परवानगी केंद्र सरकारच देईल. पुढील दोन महिन्यांसाठी ही आणीबाणी असेल. मात्र आणीबाणीचा कालावधी वाढवण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाची संमती आवश्यक असेल.

१८ हजार कोटींचे कर परतावे तत्काळनवी दिल्ली : प्राप्तीकर, वस्तू व सेवाकर (जीएसटी) व सीमाशुल्काचे (कस्टम्स) प्रलंबित असलेले सुमारे १८ हजार कोटींचे परतावे (रिफंड) तत्काळ अदा करण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाने जाहीर केला. यामुळे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सुमारे १५ लाख व्यावसायिक, व्यापारी व लघु तसेच अतिलघु उद्योजकांच्या हाती अधिक पैसा येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक