शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

coronavirus: लॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:11 IST

उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पद्धतीवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाग करण्यात आलेले व्यापक लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अनलॉक-1 असे नाव देऊन देशातील लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना राजीव बजाज यांनी आपलं मत मांडलं.

या संवादावेळी बजाज अॉटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले की, "भारतात ड्रेकोनियन म्हणजेच निर्दयी पद्धतीने लागू करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये एवढी सक्ती करण्याची गरज नव्हती. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे." 

राजीव बजाज यांनी पुढे सांगितले की, जपान, अमेरिका, युरोप, सिंगापूरसारख्या देशात आमचे मित्र आहेत. त्याशिवाय जगातील अनेक देशातील मंडळींशी आमची चर्चा होते. मात्र भारतात कठोर पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा पद्धतीने कुठेही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जगातील अनेक देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची परवानगी होती. मात्र आपल्याकडे वेगळंच चित्र होतं. 

लॉकडाऊनच्याबाबतीत नेमकं काय चुकलं हे सांगताना राजीव बजाज म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने पूर्वेकडील देशांऐवजी पश्चिमेकडे पाहिले. आम्ही इटली, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदींचे अनुकरण केले. खरंतर आपण पूर्वेकडील देशांचे अनुकरण केले पाहिजे होते. या देशात कोरोनाला रोखण्याच्याबाबतीत चांगले काम झाले. तापमान, भौगोलिक वैशिष्ट्य, मेडिकल सह तमाम वैशिष्ट्यांमुळे हे देश आपल्यासाठी अनुकरणीय ठरले असते. 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने लॉकडाऊन कठीण आहे. कारण भारतासारखे कठीण लॉकडाऊन कुठेच लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण मध्यम मार्ग काढण्यासाठी इच्छुक आहे. भारताने पश्चिमेकडील देशांपेक्षा कठीण लॉकडाऊन लागू केले.  कमकुवत लॉकडाऊनमुळे विषाणू पसरतो आणि कठोर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिघडते, असेही ते पुढे म्हणाले. सध्या जगभरात सरकारकडून सर्वसामान्यांना थेट मदत दिली जात आहे. मात्र भारतात केवळ सहकार्याची भाषा केली गेली. सरकारकडून सर्वसामान्यांना पैसे दिले गेले नाहीत. 

दरम्यान, या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लॉकडाऊन अपयशी ठरल्याचे सांगितले. माझ्या दृष्टीने भारतातील लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. आता केंद्र सरकार माघार घेत राज्यांना परिस्थिती सांभाळण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाRahul Gandhiराहुल गांधी