शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:11 IST

उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पद्धतीवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लाग करण्यात आलेले व्यापक लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अनलॉक-1 असे नाव देऊन देशातील लॉकडाऊनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, उद्योगपती राहुल बजाज यांनी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर टीका केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना राजीव बजाज यांनी आपलं मत मांडलं.

या संवादावेळी बजाज अॉटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले की, "भारतात ड्रेकोनियन म्हणजेच निर्दयी पद्धतीने लागू करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये एवढी सक्ती करण्याची गरज नव्हती. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे." 

राजीव बजाज यांनी पुढे सांगितले की, जपान, अमेरिका, युरोप, सिंगापूरसारख्या देशात आमचे मित्र आहेत. त्याशिवाय जगातील अनेक देशातील मंडळींशी आमची चर्चा होते. मात्र भारतात कठोर पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा पद्धतीने कुठेही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली नाही. जगातील अनेक देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची परवानगी होती. मात्र आपल्याकडे वेगळंच चित्र होतं. 

लॉकडाऊनच्याबाबतीत नेमकं काय चुकलं हे सांगताना राजीव बजाज म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने पूर्वेकडील देशांऐवजी पश्चिमेकडे पाहिले. आम्ही इटली, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदींचे अनुकरण केले. खरंतर आपण पूर्वेकडील देशांचे अनुकरण केले पाहिजे होते. या देशात कोरोनाला रोखण्याच्याबाबतीत चांगले काम झाले. तापमान, भौगोलिक वैशिष्ट्य, मेडिकल सह तमाम वैशिष्ट्यांमुळे हे देश आपल्यासाठी अनुकरणीय ठरले असते. 

सर्वसामान्यांच्या दृष्टीने लॉकडाऊन कठीण आहे. कारण भारतासारखे कठीण लॉकडाऊन कुठेच लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण मध्यम मार्ग काढण्यासाठी इच्छुक आहे. भारताने पश्चिमेकडील देशांपेक्षा कठीण लॉकडाऊन लागू केले.  कमकुवत लॉकडाऊनमुळे विषाणू पसरतो आणि कठोर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था बिघडते, असेही ते पुढे म्हणाले. सध्या जगभरात सरकारकडून सर्वसामान्यांना थेट मदत दिली जात आहे. मात्र भारतात केवळ सहकार्याची भाषा केली गेली. सरकारकडून सर्वसामान्यांना पैसे दिले गेले नाहीत. 

दरम्यान, या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लॉकडाऊन अपयशी ठरल्याचे सांगितले. माझ्या दृष्टीने भारतातील लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. आता केंद्र सरकार माघार घेत राज्यांना परिस्थिती सांभाळण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाRahul Gandhiराहुल गांधी