शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पायपीट करत गावाकडे निघालेल्या रणवीर सिंहने अखेरच्या कॉलवर काय सांगितलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:41 IST

दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या रणवीर सिंह यांचा आग्रा येथे मृत्यू झाला.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिल्ली ते मध्य प्रदेश गावाकडे निघाला होताअनेक किमी पायी चालल्यानंतर रणवीर थकला होताछातीत दुखू लागल्याने आग्रा येथील नॅशनल हायवेवर कोसळला

नवी दिल्ली – संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचं घोषित केल्यानंतर अनेक मजुरांचे आणि कामगारांचे हाल झाले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करणं गरजेचे होतं असं सांगत पतंप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माफी मागितली पण या लॉकडाऊनमुळे चालत गावाकडे निघालेल्या एका माणसाचा जीव गेला.

दिल्लीहून मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या रणवीर सिंह यांचा आग्रा येथे मृत्यू झाला. रणवीर सिंह दिल्लीत कुरिअर बॉयचं काम करत होते. लॉकडाऊनमुळे दिल्लीत खाणं-पिणं कठिण झाल्याने त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. कोणतीही वाहन व्यवस्था नसल्याने गावच्या दिशेने चालत जावं लागलं. मृत्युपूर्वी रणवीरने त्याच्या सहकाऱ्यांसोबत गावी जाण्याचं ठरवलं. दिल्लीपासून फरिदाबादला पोहचलेल्या रणवीरने रात्री साडेनऊ वाजता बहीण पिंकीला कॉल केला. याबाबत पिंकीने सांगितले की, मला त्यादिवशी अचानक भावाचा फोन आला. लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं त्यामुळे मी चालत घराकडे येत आहे. सुरुवातीला हे ऐकून मला धक्का बसला. बीबीसीने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

भावाचा फोन ठेवल्यानंतर पिंकी औषध घेऊन झोपी गेली. त्यानंतर सकाळी पाचच्या सुमारास पिंकीच्या मोबाईलवर रणवीर सिंहचा फोन आला. या कॉलवरुन रणवीरने माझ्या छातीत दुखू लागलं असं सांगितले. त्यानंतर पिंकीने रणवीरला एका ठिकाणी बसण्यास सांगितले. दिल्लीहून मथुरामार्ग सकाळी आग्रा येथे पोहचला होता. पायपीट केल्यानं रणवीर थकलेला दिसून आला. रणवीरसोबत दिल्लीत एकत्र राहणारे त्याचे नातेवाईक अरविंद होते. अरविंदसोबत रणवीरने शेवटचं बोलणं केलं. अरविंद संपूर्ण रात्र रणवीरच्या संपर्कात होता. रात्रभर चालून रणवीरची तब्येत बिघडली, कोरोनाच्या भीतीने कोणीही मदतीसाठीही आलं नाही. अखेर नॅशनल हायवेवर रणवीरचा साडेसहा वाजता मृत्यू झाला.

मला फोन केला त्यावेळी रणवीरने सांगितले माझ्या छातीत दुखत आहे. मला घेण्यासाठी येणं शक्य असेल तर ये, मी त्याला बोललो की १०० नंबरवर कॉलकर कोणीतरी मदतीसाठी येईल. त्यानंतर त्याचा आवाज बंद झाला. या कॉलनंतर ८ मिनिटांनी मी पुन्हा कॉल केला त्यावेळी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने कॉल उचलला, त्याने सांगितले रणवीरची तब्येत गंभीर आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं अरविंदने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली