शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

CoronaVirus: ...म्हणून भारतात कोरोनाचा होणार नाही मोठा प्रादुर्भाव, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 14:47 IST

न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्मानं हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही.

ठळक मुद्देजगभरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं वैज्ञानिकांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. भारतात बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नसल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्म्यात हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही.

नवी दिल्लीः जगभरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं वैज्ञानिकांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. शास्त्रज्ञ आपापल्या परीनं यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नसल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्म्यात हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही. थंड प्रदेशात हा विषाणू जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे भारतात याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होणार नाही. भारतापेक्षा कोरोना व्हायरसनं स्पेन, इटली आणि अमेरिकेत हाहाकार माजवला आहे.भारतात हा व्हायरस सिंगल स्पाइक आहे. इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये आढळणारा विषाणू हा ट्रिपल स्पाइक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास भारतात असलेला विषाणू हा नसा किंवा वाहिन्यांवर मजबुतीनं हल्ला करू शकत नाही. तसेच ट्रिपल स्पाइकवाला विषाणू हा नसांना ताकदीनं जखडतो. म्हणून भारताची या व्हायरसपासून मुक्तता होईल, असं समजू शकत नाही. भारतात कुपोषणाची मोठी समस्या आहे. अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेह अशा समस्या आहेत. अशा लोकांना या विषाणूची लवकर लागण होते. तसेच वैज्ञानिकांच्या मते, टीबी आजाराला रोखण्यासाठी मुलांना बॅसिल कॅलमेट गुयरीन म्हणजेच बीसीजीची लस टोचली जाते. ती लससुद्धा या आजारावर रामबाण ठरत आहे. ब्राझीलमध्ये १९२० आणि जपानमध्ये १९४०पासून या लसीचा वापर केला जातो. या लसीकरणानं माणसाच्या शरीरात टीबीच्या रोगजंतूंची क्षमता कमकुवत होते. त्यामुळेच सृदृढ आरोग्य असलेल्या मनुष्याला कोरोना जास्त जीवघेणा ठरत नाही. या लसीमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्निशियम सॉल्ट, ग्लिसरॉल आणि सायट्रिक ऍसिड असतात.कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी या लसीचा प्राथमिक टप्प्यात प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. देशातही १९६२मध्ये नॅशनल टीबी प्रोग्रामअंतर्गत ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. याचा अर्थ असा आहे की, भारतातल्या बहुसंख्याकांना ही लच आधीच टोचण्यात आलेली आहे. त्यामुळेदेखील भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार नसल्याचा वैज्ञानिकांना विश्वास आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या