शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

CoronaVirus Updates: देशात नव्या २६ हजार ०४१ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 11:35 IST

आतापर्यंत एकूण ३,२९,३१,९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २६,०४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत २९,६२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ३,२९,३१,९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रविवारी ३ हजार २०६ रुग्ण आणि ३६ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर सध्या ३७ हजार ८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६३ लाख ६४ हजार २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८१ लाख ५८ हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ६१ हजार ७२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर १ हजार ५१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के असून मृत्यूदर २.१२ टक्के आहे.

मुंबईत रविवारी ४७९ रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४१ हजार २४० वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ८४ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ६६७ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १८ हजार २ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०६% टक्के आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २०८ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस