शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:23 IST

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. आता दिल्ली एम्सने या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. "SARS-CoV-2 (कोरोनाव्हायरस) हा 'RNA' विषाणू आहे. त्याच्या प्रकारांमध्ये बदल होत राहणार हे नक्की. त्यात एक हजाराहून अधिक बदल झाले आहेत. मात्र, असे केवळ 5 प्रकार समोर आले असून, ते चिंतेचं कारण बनलं आहे", AIIMS दिल्लीचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले. 

"गेल्या वर्षी भारताला कोरोना व्हायरसच्या अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, जो खूप दुर्दैवी होता. मात्र, आता कोरोना लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यासोबतच भारतीयांमध्ये निर्माण होणारा नैसर्गिक संसर्ग ही एक मोठी शक्ती आहे, जी लोकांना दीर्घ काळासाठी चांगले संरक्षण प्रदान करते. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या कोणत्याही लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही", असं डॉ. संजय राय म्हणाले. 

'मास्क वापर शिथिल करण्याचा सरकार विचार करू शकते'"सध्याची वेळ अशी आहे की भारत सरकार मास्क वापरण्याचा नियमात शिथिलता आणण्याचा करण्याचा विचार करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा संशय असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे सुरू ठेवावं", असं डॉ. राय म्हणाले. भविष्यात कोरोनाव्हायरसचे कोणतेही नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं जीनोमिक सिक्वेन्सिंगसह SARS-CoV-2 चं निरीक्षण करणं सुरू ठेवावं, यावरही राय यांनी भर दिला. 

'कोरोना भारतात जास्त संसर्गजन्य होणार नाही'आणखी एक एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे नवीन प्रकार भारतात समोर आले असले तरी, भारतात संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी आहे. "जर आपण सीरो सर्वेक्षण, लसीकरण कव्हरेज आणि व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार यांचा डेटा पाहिला, तर असा निष्कर्ष काढता येईल की भारतात कोरोना महामारी संपली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांपर्यंत भारतात कोरोनाची नवी लाट आणि नवीन रूपे समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक लोकसंख्येला मास्क घालण्याच्या अनिवार्यतेपासून सूट दिली जाऊ शकते", असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले. 

'लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे'सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ जुगल किशोर यांनीही हेच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ''सीरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 80-90 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणजेच आता भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार आता लोकांना मास्क घालण्यासारख्या उपायांमधून सूट देऊ शकते"

लसीकरणावरील नॅशनल कन्सल्टन्सी ग्रुपच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी देशात लसीकरणाची व्याप्ती जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतात कोणत्याही नव्या लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक