शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:23 IST

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. आता दिल्ली एम्सने या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. "SARS-CoV-2 (कोरोनाव्हायरस) हा 'RNA' विषाणू आहे. त्याच्या प्रकारांमध्ये बदल होत राहणार हे नक्की. त्यात एक हजाराहून अधिक बदल झाले आहेत. मात्र, असे केवळ 5 प्रकार समोर आले असून, ते चिंतेचं कारण बनलं आहे", AIIMS दिल्लीचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले. 

"गेल्या वर्षी भारताला कोरोना व्हायरसच्या अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, जो खूप दुर्दैवी होता. मात्र, आता कोरोना लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यासोबतच भारतीयांमध्ये निर्माण होणारा नैसर्गिक संसर्ग ही एक मोठी शक्ती आहे, जी लोकांना दीर्घ काळासाठी चांगले संरक्षण प्रदान करते. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या कोणत्याही लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही", असं डॉ. संजय राय म्हणाले. 

'मास्क वापर शिथिल करण्याचा सरकार विचार करू शकते'"सध्याची वेळ अशी आहे की भारत सरकार मास्क वापरण्याचा नियमात शिथिलता आणण्याचा करण्याचा विचार करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा संशय असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे सुरू ठेवावं", असं डॉ. राय म्हणाले. भविष्यात कोरोनाव्हायरसचे कोणतेही नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं जीनोमिक सिक्वेन्सिंगसह SARS-CoV-2 चं निरीक्षण करणं सुरू ठेवावं, यावरही राय यांनी भर दिला. 

'कोरोना भारतात जास्त संसर्गजन्य होणार नाही'आणखी एक एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे नवीन प्रकार भारतात समोर आले असले तरी, भारतात संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी आहे. "जर आपण सीरो सर्वेक्षण, लसीकरण कव्हरेज आणि व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार यांचा डेटा पाहिला, तर असा निष्कर्ष काढता येईल की भारतात कोरोना महामारी संपली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांपर्यंत भारतात कोरोनाची नवी लाट आणि नवीन रूपे समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक लोकसंख्येला मास्क घालण्याच्या अनिवार्यतेपासून सूट दिली जाऊ शकते", असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले. 

'लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे'सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ जुगल किशोर यांनीही हेच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ''सीरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 80-90 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणजेच आता भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार आता लोकांना मास्क घालण्यासारख्या उपायांमधून सूट देऊ शकते"

लसीकरणावरील नॅशनल कन्सल्टन्सी ग्रुपच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी देशात लसीकरणाची व्याप्ती जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतात कोणत्याही नव्या लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक