शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus : चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा १४ दिवस दिल्लीतच मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:46 IST

Coronavirus Update : लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू; दिवसातून तीन वेळा होते तपासणी

गडचिरोली: अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी अखेर मायदेशी परतलेल्या चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांना सध्या दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीखाली राहावे लागणार आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.चीनमधील वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणानिमित्त गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या पुढाकाराने विशेष विमानांनी भारतात आणण्यात आले. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.गडचिरोलीचे रहिवासी आणि सध्या आमगाव (जि.गोंदिया) येथे कार्यरत असणारे तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली हिच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तसेच पुणे, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना दिल्लीत आणल्यानंतर तेथील लष्कराच्या रुग्णालयात विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथे दिवसातून तीन वेळा त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोना व्हायरसची लागण झालेली नसली तरी हा व्हायरस कधीही कार्यरत होण्याची शक्यता पाहता त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवले जात आहे.राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडूनही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना धीर देण्यात आला आहे. १४ दिवसांच्या देखरेखीनंतर या विद्यार्थ्यांच्या घरपोच सोडण्याची व्यवस्था सरकारकडूनच केली जाणार असल्याचे सोनाली भोयर हिचे पालक दयाराम भोयर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन