शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:04 IST

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा धोका अद्यापही संपलेला नाही. केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनाचे नवे रुग्ण समोर येतच आहेत. महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि आरोग्य सचिव राजेश भूषण केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हर्च्यूअल बैठक घेणार आहेत. (CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसची किती गरज? AIIMS चे संचालक डॉ. गुलेरियांनी स्पष्टच सांगितलं

केरळची स्थिती -दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन गुरुवारी म्हणाले, की केरळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकारचे लक्ष मोपला बंडाच्या वर्धापन दिनावर आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 31,445 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर, केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3,883,429 वर पोहोचली आहे. तर 215 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा 19,972 वर पोहोचला आहे. तसेच संक्रमण दर वाढून 19.03 टक्के झाला आहे. यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. 

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित       महाराष्ट्राची स्थिती -मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 031 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 216 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 47 हजार 414 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण 50 हजार 183 इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळ