शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

CoronaVirus: कोटा येथे अडकले राज्यातील दोन हजार विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:49 IST

सुटकेसाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क; स्पर्धा परीक्षेसाठी गेले, लॉकडाउनमुळे रखडले

मुंबई : आयआयटी, मेडिकलसारख्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासाठी राजस्थानातील कोटा येथे गेलेले राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी लॉकडाउनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. तेथे त्यांची गैरसोय होत असून महाराष्ट्रात येण्यासाठी ते आपापल्या विभागातील आमदार, खासदारांकडे पाठपुरावा करत असून त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.लॉकडाउन लांबल्यानंतर केंद्र सरकारने राजस्थान सरकारला जे राज्य त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेण्याची इच्छा दर्शवित आहेत त्यांना परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार राजस्थान सरकारने सहकार्यही केले. यामुळे उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना विशेष बसगाड्यांनी स्वगृही आणले. मात्र राज्यातील विद्यार्थी अजूनही तेथे अडकले आहेत.काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तर, काही पेर्इंगगेस्ट म्हणून राहात आहेत. राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर आमची सुटका करावी, इतर राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेले. त्यामुळे आम्हालाही सरकारने महाराष्ट्रात परत नेण्याची व्यवस्था करावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.सरकार प्रयत्नशीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन्ही सरकार मिळून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यात येईल असे टिष्ट्वट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची सोय करावी असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या