शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोटा येथे अडकले राज्यातील दोन हजार विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:49 IST

सुटकेसाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क; स्पर्धा परीक्षेसाठी गेले, लॉकडाउनमुळे रखडले

मुंबई : आयआयटी, मेडिकलसारख्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासाठी राजस्थानातील कोटा येथे गेलेले राज्यातील सुमारे दोन हजार विद्यार्थी लॉकडाउनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. तेथे त्यांची गैरसोय होत असून महाराष्ट्रात येण्यासाठी ते आपापल्या विभागातील आमदार, खासदारांकडे पाठपुरावा करत असून त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.लॉकडाउन लांबल्यानंतर केंद्र सरकारने राजस्थान सरकारला जे राज्य त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेण्याची इच्छा दर्शवित आहेत त्यांना परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार राजस्थान सरकारने सहकार्यही केले. यामुळे उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना विशेष बसगाड्यांनी स्वगृही आणले. मात्र राज्यातील विद्यार्थी अजूनही तेथे अडकले आहेत.काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तर, काही पेर्इंगगेस्ट म्हणून राहात आहेत. राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर आमची सुटका करावी, इतर राज्यातील सरकारने त्यांच्या विद्यार्थ्यांना परत नेले. त्यामुळे आम्हालाही सरकारने महाराष्ट्रात परत नेण्याची व्यवस्था करावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.सरकार प्रयत्नशीलमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला आहे. दोन्ही सरकार मिळून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यात येईल असे टिष्ट्वट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची सोय करावी असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या