शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २३६ वर, बळींची संख्या ५

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 06:50 IST

भारतात मरण पावलेल्यांची संख्या ५वर पोहोचली आहे. यात दिल्ली, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आदी भागांतील रुग्णांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३६ वर पोहोचली आहे. त्यात ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे १७, फिलिपिन्सचे २, ब्रिटनचे २, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.भारतात मरण पावलेल्यांची संख्या ५वर पोहोचली आहे. यात दिल्ली, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आदी भागांतील रुग्णांचा समावेश आहे. दिल्लीत कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असून त्यात एका विदेशी नागरिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये १९ रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ५२ रुग्ण असून त्यात ३ विदेशी नागरिक आहेत. केरळमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा २८वर पोहोचला असून त्यात २ विदेशी आहेत. कोरोनाची बाधा कर्नाटकमध्ये १५, लडाखमध्ये १०, जम्मू-काश्मीरमध्ये ४, तेलंगणामध्ये १६ जणांना झाली आहे. राजस्थानात २ विदेशी नागरिकांसह ७ जणांना, तामिळनाडूत ३ तर आंध्र प्रदेशमध्ये २ जणांना लागण झाली आहे. ओडिशा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुडुचेरी, चंदीगढ, पंजाबमध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आहे. हरयाणात १२ जणांचा बाधित असून त्यात १४ विदेशी आहेत.इटलीच्या नागरिकाचा मृत्यूकोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्याचा झालेला इटलीमधील एक नागरिक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी रात्री जयपूर येथील फोर्टिस रुग्णालयात मरण पावला. त्याचे वय ६९ वर्षांचे होते. तो व त्याची पत्नी दोघेही भारतात पर्यटनाला आलेले होते.ते कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर त्यांच्यावर एसएमएस वैैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. हे दोघेही कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले होते. त्या दांपत्यापैैकी पुरुष रुग्णाला एसएमएस रुग्णालयातून फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पत्नीच्या प्रकृतीत मात्र सुधारणा झाली आहे.कोरोनाचा सामूहिक संसर्ग नाही - डॉ. हर्षवर्धनदेशात कोरोना विषाणूचा सामुहिक संसर्ग अद्याप कोणालाही झालेला नाही असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असेही त्यांनी सांगितले.काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी लोकसभेतील शून्य प्रहरात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना विषाणूची साथ रोखण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकार घेत आहे. कोरोनाबाबत संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्याही आम्ही संपर्कात आहोत.तज्ज्ञांकडून मिळत असलेल्या माहितीचा कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकार योग्य प्रकारे वापर करत आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडून कोरोना विषाणूच्या साथीबाबत संशोधन सुरू आहे. तसेच केंद्र सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या नित्य संपर्कात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत