शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

coronavirus: लॉकडाऊनमुळे तीन दिवसांपासून ३ बहिणी उपाशी, पंतप्रधान कार्यालयात फोन केला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 12:18 IST

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली

पाटणा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिब आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्याकडील कामगारवर्गाला कमी केल, तसेच घरगुती काम करणाऱ्यांना मजूरांनाही घरी बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही या मजूर वर्गाला त्यांच्या मालकांकडून वेतन मिळाले नाही. तसेच, या स्थलांतरीत मजूरांच्या निवासाची सोयही करण्यात आली नाही. बिहारच्या भागलपूर येथील अशीच एक घटना समोर आली आहे. खंजरपूर येथील तीन बहिणी गेल्या तीन दिवसांपासून उपाशीपोटी झोपत आहेत. या बहिणींनी अखेर पंतप्रधान कार्यालयास फोन करुन आपली व्यथा सांगितली. 

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली. बडी खंजरपूर येथील विषहरी परिसरात गौरी कुमारी, आशा कुमारी आणि कुमकुम या तीन बहिणी राहत आहेत. त्यांच्या माता-पित्याचे निधन झाल्याने त्या तिघीच एमकेकींचा सहारा आहेत. त्यांना आणखी एक लहान बहिण असून ती सध्या मावशीकडे राहते. तर, या तिन्ही बहिणी दुसऱ्याच्या घरात मोलमजुरी करुन आपलं सन्मानाने जीवन जगतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे काम गेले असून सध्या त्या घरीच राहतात. तर, घरात पुढील १४ दिवस पुरेल एवढे अन्नही नाही. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान कार्यालयास फोन करुन गेल्या ३ दिवसांपासून उपाशी असल्याची व्यथा मांडली. त्यानंतर, प्रशासनाने तात्काळ मदत पाठवली. 

जगदीशपूरचे सीओ सोनू भगत यांनी याबाबत माहिती दिली, पंतप्रधान कार्यालयातून बिहार आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात, या तिन्ही मुलींनी तात्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ तेथे जाऊन तिन्ही मुलींच्या जेवणाची सोय केली. तसेच, त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, तिघींचीही प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासना या तिन्ही मुलींची काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारprime ministerपंतप्रधान