शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

coronavirus: लॉकडाऊनमुळे तीन दिवसांपासून ३ बहिणी उपाशी, पंतप्रधान कार्यालयात फोन केला अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 12:18 IST

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली

पाटणा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिब आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्याकडील कामगारवर्गाला कमी केल, तसेच घरगुती काम करणाऱ्यांना मजूरांनाही घरी बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही या मजूर वर्गाला त्यांच्या मालकांकडून वेतन मिळाले नाही. तसेच, या स्थलांतरीत मजूरांच्या निवासाची सोयही करण्यात आली नाही. बिहारच्या भागलपूर येथील अशीच एक घटना समोर आली आहे. खंजरपूर येथील तीन बहिणी गेल्या तीन दिवसांपासून उपाशीपोटी झोपत आहेत. या बहिणींनी अखेर पंतप्रधान कार्यालयास फोन करुन आपली व्यथा सांगितली. 

पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली. बडी खंजरपूर येथील विषहरी परिसरात गौरी कुमारी, आशा कुमारी आणि कुमकुम या तीन बहिणी राहत आहेत. त्यांच्या माता-पित्याचे निधन झाल्याने त्या तिघीच एमकेकींचा सहारा आहेत. त्यांना आणखी एक लहान बहिण असून ती सध्या मावशीकडे राहते. तर, या तिन्ही बहिणी दुसऱ्याच्या घरात मोलमजुरी करुन आपलं सन्मानाने जीवन जगतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे काम गेले असून सध्या त्या घरीच राहतात. तर, घरात पुढील १४ दिवस पुरेल एवढे अन्नही नाही. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान कार्यालयास फोन करुन गेल्या ३ दिवसांपासून उपाशी असल्याची व्यथा मांडली. त्यानंतर, प्रशासनाने तात्काळ मदत पाठवली. 

जगदीशपूरचे सीओ सोनू भगत यांनी याबाबत माहिती दिली, पंतप्रधान कार्यालयातून बिहार आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात, या तिन्ही मुलींनी तात्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ तेथे जाऊन तिन्ही मुलींच्या जेवणाची सोय केली. तसेच, त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, तिघींचीही प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासना या तिन्ही मुलींची काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारprime ministerपंतप्रधान