शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

देशात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येणार? किती घातक असणार? BHUच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 20:40 IST

केरळ आणि ईशान्य भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आशियातील सर्वात मोठं निवासी विद्यापीठ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या जंतू विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून दिलासादायक बाब समोर आली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून केरळ आणि ईशान्येकडे असलेल्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली. त्यानंतर आता बनारस हिंदू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरी लाट किमान तीन महिन्यांनी येईल. ही लाट रोखण्यात लसीकरण अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल. कोरोनातून बरे झालेल्या आणि लसीकरण झालेल्या लोकांना सुरक्षा मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या लाटेत लहान मुलं सुरक्षित असतील, असं संशोधन सांगतं.

कोरोनाची तिसरी लाट अद्याप तीन महिने दूर आहे. ही लाट फारशी घातक असणार नाही, असं बनारस हिंदू विद्यापीठाच्या जंतू विज्ञान विभागाचे प्राध्यापक जानेश्वर चौबे यांनी सांगितलं. 'केरळ आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. केरळमधल्या ४० टक्के लोकांमध्ये सीरी पॉझिटिव्हिटी तयार झाली आहे. उत्तर प्रदेशात ७० टक्के लोकांमध्ये सीरी पॉझिटिव्हिटी तयार झाली होती,' असं चौबे म्हणाले.

'केरळमध्ये रुग्णसंख्या एका महिन्यानंतर कमी होईल. तिथली परिस्थिती उत्तर प्रदेशसारखी होईल. आता तिसरी लाट येणार नाही. दर तीन महिन्यांनी एँटिबॉडीचं प्रमाण कमी होईल. तेव्हा तिसरी लाट येऊ शकते. मात्र लसीकरण वेगानं सुरू असल्यानं कोरोनाशी दोन हात करण्यात यश येईल. रोगप्रतिकारशक्ती ७० टक्क्यांच्या वर गेल्यावर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता मावळेल,' अशी माहिती चौबेंनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस