शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

coronavirus : कोरोना चाचण्या घेण्यामध्ये या राज्यांनी घेतली आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 17:14 IST

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगसोबतच अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. ...

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगसोबतच अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना शोधून काढण्यात यश मिळत आहे. दरम्यान, अधिकाधिक चाचण्या घेण्यामध्ये दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी आघाडी घेतली आहे. तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये कोरोनाच्या सर्वात कमी चाचण्या झाल्या आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे सरासरी 483 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर राज्यवार विचार केल्यास दिल्लीमध्ये 25 एप्रिलपर्यंत दर दशलक्ष लोकसंख्येमागे.1760 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये दर दहा लाख लोकांमागे 1171 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.  तामिळनाडूमध्ये दर दहा लाख लोकांमागे 1058 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. राजस्थानमध्ये दर दशलक्ष लोकांमागे. 1011 चाचण्या होत आहेत. तर जम्मू काश्मीरमध्ये दर दहा लाख लोकांमागे 964 कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. या यादीत महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात दर दहा लाख लोकांमागे 818 चाचण्या होत आहेत. तर गुजरातमध्ये दर दशलक्ष लोकांमागे 701 कोरोना चाचण्या होत आहेत. 

तर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या सर्वात कमी चाचण्या होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये दर दहा लाख लोकांमागे केवळ 100 चाचण्या होत आहेत. तर बिहारमध्ये दर दहा लाख लोकांमागे 130 तर उत्तर प्रदेशमध्ये 246 कोरोना चाचण्या होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली