शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 08:33 IST

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेराज्यात येणाऱ्या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दावा

हैदराबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील बहुतांश देशाला विळख्यात ओढलं आहे. चीनपेक्षाही अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत १ लाख ४२ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजार ४०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात १८६, केरळमध्ये १८२, कर्नाटक ७६, तेलंगणा ७० या चार राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगणामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला आहे. याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ७ एप्रिलपर्यंत तेलंगणा कोरोनामुक्त राज्य बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहेत. जर लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केले तर राज्यात येणाऱ्या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही. २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

 

या बैठकीला पोलीस अधिक्षक, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत २५ हजार ९३७ जणांना होम क्वारंटाईन केलं आहे. ७० रुग्णापैकी ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. अनेक जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी ११ जणांना डिस्चार्ज देणार आहोत. उरलेल्या ५९ रुग्णांपैकी ७५ वर्षाच्या एक रुग्ण वगळता उर्वरित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना ७ एप्रिलपर्यंत डिस्चार्ज दिलं जाईल. ७५ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर नाही पण त्यांना ठिक व्हायला वेळ लागणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत राज्य लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे. आम्ही कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहोत. एअरपोर्ट, सार्वजनिक वाहतूक आणि राज्याची सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता फारच कमी आहे असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र