शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

CoronaVirus: कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:56 IST

गावे सक्षम करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोनामुळे जग बदलेल. बदलेल्या जगासोबत आपल्याला गावे सक्षम करावी लागतील. स्वयंसिद्ध स्वयंपूर्णता हाच कोरोनाचा सर्वात मोठा धडा आहे. त्यामुळे आपल्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे लागेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भारतासाठी दिला. कोरोनाला रोखण्यासाठी दोन फूट अंतर हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगून मोदींनी फिजिकल डिस्टन्सिंगची सोपी व्याख्या केली. राष्ट्रीय पंचायत दिनी पंतप्रधानांनी देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. लॉकडाऊनची परिस्थिती, गावकऱ्यांचे अनुभव त्यांनी जाणून घेतले.सार्वजनिक सेवा केंद्रामुळे गावकऱ्यांची सोय झाली. तात्काळ मदत मिळू लागली. कधीकाळी केवळ १०० ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड होते. आता भारतनेट योजनेमुळे सव्वा लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायती इंटरनेटशी कनेक्ट होतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ई- ग्राम स्वराज पोर्टलचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. गावागावांतील विकासकामांची माहिती त्यावर अपडेट करण्यात येईल. ई-स्वराज पोर्टलमुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येईल.काय म्हणाले मोदी?आपल्या कामाची पद्धत बदलली आहे. संपर्क येणार नाही ही नवी कामाची व्यवस्था उभारावी लागेल. गावाने संघटित व्हावे. प्रत्येक शेतकºयाने, गावकºयाने स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.तुम्हाला सुरक्षित राहावेच लागेल. लॉकडाऊन असला तरी देशभरात धान्य, दूध, दही, फळ, भाजीपाल्याची कमतरता शेतकºयांनी भासू दिली नाही. ग्रामीण भागाने संकटकाळी मोठी मदत केली आहे. आधी (काँग्रेसच्या काळात) दिल्लीहून निधी पाठविल्यास ग्रामीण भागात केवळ १५ पैसे पोहोचायचे.गावागावांत लॉकडाऊनचे प्रभावी पालन होत आहे. गावातून मिळणारी माहिती माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही मोदींनी आवर्जून सांगितले.आता पूर्ण १०० पैसे पोहोचतात. कोरोना विषाणू न बोलावता कुणाच्याही घरी जात नाही. त्यामुळे घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या