शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

Coronavirus: मोदींशी संवाद साधताच, 'या' मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन समाप्तीची तारीख घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:31 IST

पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना विषाणूमुळे सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना,

नवी दिल्ली - देशात सार्वत्रिक लॉकडाऊनची घोषणा करून आठ दिवस होत आले तरी त्याचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आलेला नाही. तसेच देशातील कोरोनाबधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांतील परिस्थिती मोदींनी जाणून घेतली. मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन समाप्तीची तारीखच घोषित केली आहे. 

पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना विषाणूमुळे सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, तसेच पुढील रणनीती यावर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मोदींशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी, राज्यातील परिस्थिती आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र, अरुणाचल प्रदेशचेमुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोदींसमवेत झालेल्या संवादानंतर देशातील लॉकडाऊन कधी संपुष्टात येईल, यासंदर्भात घोषणाच केली. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन पेमा यांनी १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपणार असल्याचे म्हटले. मात्र, तरीही आपण सोशल डिस्टन्सींग आणि स्वच्छता, मास्कचा वापर हे नियम पाळायचे आहेत, गर्दीत जाणंही टाळायला हवे, असेही खांडू यांनी म्हटले होते. मात्र, खांडू यानी काही वेळातच आपलं ट्विट डिलीट केलंय. कदाचित लॉकडाऊन संपुष्टातची घोषणा करणे हे आपलं काम नाही, हे लक्षात आल्यानेच त्यांनी ते ट्विट डिलीट केलंय. 

पेमा खांडू हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून तरुण मुख्यमंत्री आहेत. उत्साहाच्या भरात त्यांनी लॉकडाऊन समाप्तीची एकप्रकारे घोषणाच केली होत. मात्र, चूक लक्षात येताच ते ट्विट डिलीट केलं. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री